HW News Marathi
देश / विदेश

आज पुन्हा एकदा रात्री ८ वाजता पंतप्रधान जनतेला संबोधित करणार

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (२४ मार्च) पुन्हा एका रात्री ८ वाजता जनतेला संबोधितत करणार आहेत. तसे त्यांनी ट्विट करत भारतवासीयांना सांगितले आहे. देशात अनेक राज्यांत, जिल्ह्यांत लॉकडाऊन तर केला आहेच तसेच संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. मात्र आता कोणती घोषणा पंतप्रधान करणार याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला रात्र ८ वाजता संबोधले होते. ज्यात त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधला होता. ज्या अत्यावश्यक सेवा अर्थात डॉक्टर, नर्स, पोलीस हे सगळे जण दिवस रात्र कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी २२ मार्चला जनता कर्फ्यू घोषित केला होता आणि त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता ताळ्या-थाळ्या वाजवत या सगळ्यांचे कौतुक करावे असे त्यांनी म्हटले होते. देशावर कोरोनाचे संकट आल्यापासून पंतप्रधान दुसऱ्यांदा जनतेला संबोधित करणार आहेत. आज नेमकी ते काय बोलणार किंवा कोणती घोषणा करणार हे ऐकणे महत्त्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पतंजलीवर सरकारची कृपादृष्टी, विरोधक आक्रमक

swarit

“पश्चिम बंगालमध्ये माता बॅनर्जींचा विजय झाला तर मोदी-शहांचा व्यक्तिगत पराभव मानायला हवा”

News Desk

श्रीनगरमधील पोलीस चौकीत दहशतवादी हल्ला

News Desk