मुंबई | काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. मानहानी प्रकरणी राहुल गांधींची खासदारकी रद्द लोकसभा सचिवालयाने करण्यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. मानहानी प्रकरणी सूरत जिल्हा व सत्र न्यायालयाने (Surat District and Sessions Court) राहुल गांधींना गुरुवारी (23 मार्च) दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. परंतु, काही वेळाने सूरत जिल्हा व सत्र न्यायालयाने राहुल गांधींना 15 हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा सचिवालयाने आज (24 मार्च) राहुल गांधीवर कारवाई करत खासदारकी रद्द केली आहे. राहुल गांधीवर झालेले ही कारवाई काँग्रेससाठी (Congress) मोठा फटका मानला जातो.
राहुल गांधीवर न्यायालयाने केल्या कारवाईनंतर गुरुवारीपासून काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर संसदेत आज अदानी प्रकरणावरून राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपने आक्रमक असल्याचे दिसून आले. राहुल गांधींनी मोदी आडनावावरून वादग्रस्त व्यक्तव्य केल्यामुळे सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या विरोधात राहुल गांधींनी उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी 30 दिवसांचा वेळी दिला. तरी ही राहुल गांधीला सुनावलेली शिक्षा स्थगिती झालेली नाही. परंतु, मानहानी प्रकरणात राहुल गांधींना जामीन देखील मंजूर झाला.
नेमके काय आहे प्रकरण
काँग्रेस नेते राहुल गांधींनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केले होते. राहुल गांधींनी कर्नाटकात प्रचारासाठी गेले असताना ‘मोदी’ आडनावावरून टीका केली होती. “सर्वच चोरांचे नावे ही मोदी का असतात. यात नीरव मोदी, ललित मोदी अशी नावे घेतली,” असे विधान राहुल गांधी करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधीच्या विधानाचा आक्षेप घेत भाजप आमदार पूर्णेश मोदी त्यांच्याविरोधात सूरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्यावर सुरत जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा सुनावली.
संबंधित बातम्या
मानहानी प्रकरणी राहुल गांधींना सूरत न्यायालयाकडून जामीन मंजूर; जाणून घ्या संपर्ण प्रकरण