HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन घेतले

नवी दिल्ली। माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे काल (६ ऑगस्ट) रात्री हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन झाले. सुषमा यांना रात्री नऊ वाजताच्या सुमारास त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री त्यांचे पार्थिव दिल्लीतील निवासस्थानी आणण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे ज्येष्ठ लालाकृष्ण आडवाणी, गृहमंत्री अमित शहा त्यांच्या निवासस्थानी जावून त्यांचे अंतिम दर्शन घेतले. तर दुपारी १२ ते ३ पर्यंत भाजपच्या केंद्रीय कार्यालयात त्यांचे पार्थिव ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता लोदी रोडच्या विद्यूत दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

सुषमा स्वराज या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. तसेच भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री अशीदेखील त्यांची ओळख आहे. स्वराज यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर परराष्ट्र खाते सांभाळणाऱ्या त्या दुसऱ्या नेत्या होत्या. २०१४ ते २०१९ या कार्यकाळात त्यांनी त्यांच्या राजकीय कार्यकर्तीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले. मोदींच्या परराष्ट्र धोरणांमध्ये स्वराज यांचा कायमच महत्वाचा वाटा राहीला. सुषमा स्वराज यांच्या जाण्याने भाजपचे तर मोठे नुकसान झाले आहेच. पण राजकारणातील एक अत्यंत हुशार आणि प्रभावी राजकारणी या देशाने सुषमा स्वराज यांच्या रुपाने गमावला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऑनलाईन सट्टा कंपनीच्या संचालकाला सायबर पोलिसांकडून अटक

News Desk

अनिश्चित काळासाठी ‘समझौता एक्सप्रेस’ रोखण्याचा पाकिस्तानचा निर्णय

News Desk

कर्तव्यपथावर ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि’वर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ

Aprna