HW News Marathi
देश / विदेश

आज पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’, भारत-चीन तणावासह कोरोना अनलॉकविषयी बोलणार?

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. मोदी हे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाद्वारे संवाद साधत असतात. देशभरात कोरोनामुळे जवळपास दोन महिन्यांपर्यंत लॉकडाऊन होता. आता अनलॉक करत काही गोष्टींना सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

आज (२८ जून) पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ या मासिक कार्यक्रमातून पुन्हा जनतेशी संवाद साधणार आहेत. ‘मन की बात’चा त्यांचा हा ६६वा एपिसोड आहे. आजच्या मन की बात कार्यक्रमातून नरेंद्र मोदी हे भारत-चीन दरम्यानचा तणाव, पेट्रोल-डिझेल दरवाढ तसेच कोरोना अनलॉकविषयी काय बोलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील ३१ मेच्या मन की बातमध्ये मोदींनी मजुरांना काम देण्यासाठी उपाययोजना तसेच स्थलांतरित मजुरांच्या दृष्टीने काम सुरू झाले असल्याचे सांगितले होते. घरी परतणाऱ्या मजुरांना काम मिळावे म्हणून वेगवेगळ्या राज्यात उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत, असेही पंतप्रधानांनी सांगितले होते. त्या दृष्टीने कामाची सुरुवात देखील झाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मूमध्ये बस स्टँडवर ग्रेनेड हल्ला

News Desk

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द ! मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाला वर्ष पूर्ण

News Desk

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, महापुरामुळे अनेकजण वाहून गेले, अलर्ट केला जारी

News Desk