HW News Marathi
देश / विदेश

राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे लोकसभेत गदारोळ

नवी दिल्ली | काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी महिलांचा अपमान केल्याचा आरोप भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभेत केला आहे. राहुल गांधींनी महिलांची माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभेत केले आहे. लोकसभेचे सत्र आज (१३ डिसेंबर) सुरू होताच, भाजपच्या महिला खासदारांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर लोकसभेत गदारोळ सुरू केला. राहुल गांधींनी झारखंडमधील प्रचार रॅलीदरम्यान ‘रेप इन इंडिया’ असे वक्तव्य केले होते. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर भाजपच्या खासदार स्मृरती इराणी यांनी आक्षेप घेत, त्यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे. या गोंधळामुळे लोकसभेतील कामकाज १२.१५पर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

राहुल गांधी यांनी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यांतील प्रचार रॅलीदरम्यान हे वक्तव्य केले होते. झारखंडमधील गोड्डा येथे राहुल गांधीची काल (१२ डिसेंबर) प्रचार सभा होती. या सभेदरम्यान राहुल गांधी म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात ‘मेक इन इंडिया’, पण आता तुम्ही पाहाल तर जिकडे तिकडे ‘मेक इन इंडिया नाही’ तर ‘रेप इन इंडिया’, असे वक्तव्य केले. राहुल गांधी पुढे म्हणाले की, तुम्ही वर्तमान पत्र उघडली तर झारखंडमध्ये महिलेवर बलात्कार, उत्तर प्रदेशमध्ये बघा तर नरेंद्र मोदींच्या आमदारांनी महिलेवर बलात्कार केला. यानंतर त्या महिलेच्या गाडीचा अपघात घडविला, हे सर्व झाले तरी देखील मोदी एक शब्द देखील बोलेले नाही. प्रत्येक प्रदेशमध्ये दररोज ‘रेप इन इंडिया’, मोदी म्हणतात, ‘बेटी पढाओ बेटी ‘, ‘बेटी बचाव बेटी ‘, मात्र, मोदी तुम्ही हे नाही सांगितले की, महिलांना कोणापासून वाचवायचे आहे. भाजपच्या आमदारांपासून वाचवायचे आहे का?,” असा सवाल राहुल गांधींनी मोदी सरकारला विचारला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आयएसआयएसचे नवीन मॉड्युल दिल्लीसह उत्तर प्रदेशात सक्रीय

News Desk

न्यूज क्लिकच्या कार्यालयावर ईडीचा छापा

News Desk

भारतरत्न जाहीर झाल्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी केले ‘हे’ विधान

News Desk