HW News Marathi
देश / विदेश

“आज बॅरिकेड हटवले उद्या तीन्ही कृषी कायदे हटवले जातील”-राहूल गांधी

दिल्ली | हरियाणाहून दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या टीकरी बॉर्डरवर वाहतूक सुरु करण्यासाठी पोलिसांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, हे बॅरिकेड्स हटवताच काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रया दिली आहे. आज बॅरिकेड हटवले उद्या तीन्ही कृषी कायदे हटवले जातील असं म्हणत राहूल गांधी यांनी पून्हा एकदा केंद् सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांचा विरोध केला. “अभी तो सिर्फ़ दिखावटी बैरिकेड हटे हैं, जल्द ही तीनों कृषि विरोधी क़ानून भी हटेंगे। अन्नदाता सत्याग्रह ज़िंदाबाद!” असं ट्विट राहूल गांधी यांनी यावेळी केलं. केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरू आहे.

शेतकऱ्यांना बाजूला हटवण्यासाठी पून्हा एकदा प्रयत्न केला जाऊ शकतो

या ठिकाणी दिल्लीकडे येणाऱ्या शेतकऱ्यांना आडवण्यासाठी सिंघू दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी मोठे बॅरिकेड्स लावलेले होते. पोलिसांनी आता गाझीपूर सीमेवरील हे बॅरिकेड्स बाजूला हटवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे याठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांना बाजूला हटवण्यासाठी पून्हा एकदा प्रयत्न केला जाऊ शकतो. दरम्यान, नोव्हेंबर २०२० पासून तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीतील टिकरी, सिंघू आणि गाझीपूर सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचारानंतर नाकाबंदी वाढवण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई ते अहमदाबाद रेल्वेतील सीट्स रिकाम्याच रिकाम्या 

News Desk

काळोखात पाप करू नका, काय असेल ‘ते’ उजेडात करा !

News Desk

कराचीत आतंकवादी हल्ला, २ पाक पोलिसांचा मृत्यू

News Desk