HW News Marathi
Covid-19

“देशात १०० कोटी नव्हे फक्त २३ कोटी लसी मोफत दिल्या”, पुराव्यानिशी सिद्ध करण्याचं संजय राऊतांचं आव्हान

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी दोनच दिवसांपूर्वी देशवासीयांशी संवाद साधत देशानेकोरोना प्रतिबंध लसीकरण मोहिमेत लसीचे १०० कोटी डोस मोफत देण्याचा नवा विक्रम केल्याचा दावा केला. दरम्यान, पंतप्रधानांच्या या दाव्यानंतर याविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आणि मोठ्या प्रमाणात चर्चाही झाली. याच १०० कोटी मोफत लसीकरणाच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “देशात १०० कोटी मोफत लसीकरण झाल्याचा मोदींचा दावा खोटा असून आतापर्यंत केवळ २३ कोटी लसीच मोफत दिल्या गेल्या आहेत हे आम्ही पुराव्यासह सिद्ध करू”, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेबाबत पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संबोधताना केलेल्या दाव्यांवर बोलताना संजय राऊत पुढे म्हणाले की, “इथे लडाखमध्ये चिनी सैन्य सीमा पार करून भारताच्या हद्दीत घुसत आहे. तिथे काश्मीरमध्ये हत्याकांड सुरु आहेत आणि आपल्याकडे लसीचे उत्सव साजरे केले जात आहेत. देशातील सातत्याने वाढणारी महागाई, पेट्रोल-डिझेलचे चढे दर या कशावर कोणीच काहीच बोलत नाही”, असं म्हणत संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. खरंतर, पंतप्रधानांच्या लसीकरणाच्या दाव्याबाबत अनेक जण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

देशातील अनेक नागरिकांनी पैसे भरून लस घेतली आहे. त्यामुळे, १०० कोटी मोफत लसीकरण पूर्ण झालं हा पंतप्रधानांचा दावा पूर्णपणे चुकीचा ठरतो असं अनेकांनी स्पष्टपणे मांडलं आहे. संजय राऊत यांनी देखील यापूर्वीच या विधानावर शंका उपस्थित केली होती. तर आता आपण पुराव्यानिशी हा दावा खोटा असल्याचं सिद्ध करू असं आव्हानच संजय राऊतांनी दिलं आहे. महाराष्ट्र भाजपकडून यावर काही स्पष्टीकरण येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

देशात महाविकास आघाडी म्हणनू नव्हे तर शिवसेना म्हणून जाऊ!

संजय राऊतांनी याचसोबत दिल्लीकडे कूच करण्याचे संकेतही दिले आहेत. “राज्यातील भाजप सरकार घालवलं. आता आम्हाला दिल्लीच्या दिशेने कूच करायची आहे. आम्ही देशात महाविकास आघाडी म्हणनू नव्हे तर शिवसेना म्हणून जाऊ. महाराष्ट्रातील सत्ता गेल्यापासून चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची झोप उडाली आहे. आम्हाला मात्र शांत झोप लागते”, असा टोलाहि यावेळी राऊतांनी लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात शाळांपाठोपाठ सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे देखील होणार सुरू; धनंजय मुंडेंचा निर्णय

Aprna

राज्य सरकारने जून-जुलैतील कोरोनबाधितांची संभाव्य संख्या विचारात घेऊन तयारी करावी !

News Desk

राज्यातील लॉकडाऊन कायम राहणार, मात्र…! आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

News Desk