HW News Marathi
देश / विदेश

केंद्रात भाजपला जबरदस्त धक्का, शिरोमणी अकाली दलचा NDAतून काढता पाय

नवी दिल्ली | केंद्रातील मोदी सरकारला मोठा झटका बसला आहे. कृषी विधेयकांमुळे लोकशाही आघाडीमध्ये फूट पडली आहे. शेतकरी प्रश्नावर आणि कृषी विधेयकावरुन भाजपचा घटक पक्ष शिरोमणी अकाली दलाने भाजपला रामराम केले आहे. जुना सहकारी शिरोमणी अकाली दल यांनी एनडीएतून काढता पाय घेतला आहे.

कृषी विधेयकावरून शिरोमणी अकाली दल आणि केंद्र सरकारमध्ये वादंग सुरू झाले होते. केंद्र सरकारने कृषी विधेयक, किमान हमी भावासंदर्भातील धोरणावर भूमिका न बदलल्याने शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

 

नवे कृषी धोरण जाहीर झाल्यानंतरच अन्नप्रक्रीया मंत्रीपदावरून हरसिम्रत कौर यांनी राजीनामा दिला होता. आता शिरोमणी अकाली दल एनडीएतून वेगळे झाले आहे. अकाली दलने लोकसभा आणि राज्यसभेत या विधेयकांचा विरोध केला होता. भाजप आणि अकाली दल मागील २२ वर्षांपासून सोबत आहेत. त्यामुळे हा भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत-पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी रशियाने मध्यस्थी करावी

News Desk

मराठा आरक्षणाच्या अंतरिम आदेशावर सर्वोच्च न्यायालयात आज प्रत्यक्ष सुनावणी होणार

News Desk

EVMHacking : हॅकर सैयद शुजाने केला टीमच्या ११ जणांच्या हत्येचा दावा

News Desk