HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्या | मोदी

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी देशवासीयांना संबोधित करतात. मोदींनी मन की बातमध्ये दोन वर्षापुर्वी भारतीय लष्कराने पाकिस्तान विरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईच्या आठवणी जागवल्या आणि भारतीय सैनिकांनी केलेल्या कामगिरीला सलामही केला. मोदींनी म्हटले की, २९ सप्टेंबर हा दिवस ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा जाणार आहे.

पुढे मोदी असे देखील म्हटले की, देशातील शांतता भंग करणयाचा प्रयत्न करेल त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. देशाच्या मान सन्मानासोबत कोणत्याही प्रकराची तडजोड केली जाणार नाही. मोदींनी असा इशारा यावेळी पाकिस्तानला दिला.

नौदल अधिकारी अभिलाष टॉमी यांच्या विषयी देखील मोदींनी मन की मात मधूनचर्चा केली. तो सुखरूप परत मिळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केल्याचे सांगितले. याबद्दल संपुर्ण देश चिंतेत होता. अभिलाष हा खोल समुद्रात अडकलेला होतो. तेव्हा अभिलाषच्या धाडसी सैनिक असून त्याने काही न खाता-पिता मृत्युशी झुंज देत दिली आहे. मोदींनी अभिलाष यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला असल्याची कल्पना यावेळी मन की बात मधून सांगितली. पुन्हा असा पराक्रम करण्याची इच्छा अभिलाषच्या मनात असल्याचे मोदींनी सांगितले.

महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त देशभरात कार्यक्रम

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आजपासून पुढील 2 वर्षांसाठी जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. महात्मा गांधींच्या विचारांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले आहे. गांधीजींच्या विचारांनी प्रत्येकाला शक्ती मिळली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जान भी है और जहान  भी है”, पंतप्रधानांनी दिले सर्व मुख्यमंत्र्यांना लढण्याचे बळ

News Desk

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन

News Desk

मल्ल्याची प्रत्यार्पणविरोधी याचिका इंग्लंडच्या न्यायालयाने फेटाळली

News Desk