HW News Marathi
देश / विदेश

भारताची ‘ही’ पाच विमानतळे तातडीने बंद

नवी दिल्ली | भारताच्या वायु सेनामध्ये पाकिस्तानी लढाऊ विमान शिरल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती मिळत आहे. नौशेरा सेक्ट्रमधील राजौरी येथे पाकिस्तानी विमानाने घुसखोरी केली आहे. पाकिस्तानकडून वायु सेनेच्या उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत शिरून पुंछ, राजौरी भागात बॉम्ब टाकल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

पाकिस्तानाच्या या घटनेनंतर भारताने अमृतसर, श्रीनगर, लेह, पठाणकोट आणि जम्मू या पाच ठिकाणांचे विमानतळे नागरी उड्डाणांसाठी बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारताच्या वायु सेनेच्या हद्दीत खुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानच्या विमानांना भारतीय वायू दलाकडून पिटाळून लावण्यात आले आहे. दरम्यान, अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अरुण जेटली, सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्म विभूषण जाहीर

swarit

कराचीत आतंकवादी हल्ला, २ पाक पोलिसांचा मृत्यू

News Desk

दहशतवाद्याचे चिथावणीखोर भाषणाचे 25 तास प्रसारण

News Desk