HW News Marathi
देश / विदेश

माल्ल्यावर कारवाई निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

नवी दिल्ली | भारतातील १७ बँकांकडून ९ हजार कोटींचा चुना लावून फरार झालेल्या विजय माल्ल्याला आणखी एक फटका बसला आहे. माल्ल्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कार्यवाही सुरू केली आहे. माल्ल्याची ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

त्याविरोधात माल्ल्याने आपल्या वकिलामार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळली आहे. तसेच या प्रकरणी न्यायालयाने ईडीला नोटीस जारी करत माल्ल्या विरोधातील कार्यवाही पुढे चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

माल्ल्यावर १७ बँकांचे तब्बल ९ हजार कोटींचे कर्ज आहे. माल्ल्याने २००७ ते २०१२ या दरम्यान बँकांकडून कर्ज घेतले परंतु, त्याची परतफेड केली नाही. माल्ल्याने परदेशात पलायन केल्यानंतर बँकांनी त्याची संपत्ती विकून आतापर्यंत ९६३ कोटी रुपयांची वसुली केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे लोकसभेत गदारोळ

News Desk

संयुक्त राष्ट्र संघात भारताचा विजय

swarit

केंद्रात संघाचे दोन मंत्री फेल, सुरेश प्रभुंची गच्छंती अटळ ?

News Desk