HW News Marathi
देश / विदेश

सर्वोच्च न्यायालायने भारतातील मुस्लिमांना पाकिस्तानात पाठविण्याबाबतची याचिका फेटाळली

नवी दिल्ली | केंद्र सरकारला भारतात राहणाऱ्या सर्व मुस्लिम समुदायातील लोकांना पाकिस्तानमध्ये पाठविण्याचे, तसेच पाकिस्तानमधील हिंदूंना भारतात बोलाविण्याचे निर्देश देण्यात यावेत,अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती आर. एफ. नरिमन आणि न्यायमूर्ती विनित सरन यांच्या खंडपीठामोर ही याचिका आली होती.

या याचिकेवर न्यायमूर्तींनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. “हा काय प्रकार आहे ? तुम्हाला माहिती होते कि न्यायालयात जरी या याचिकेवर सुनावणी झाली तरीही तुमच्यावर टीका करण्यात येईल. तुम्ही हा मुद्दा खरंच गंभीरपणे मांडला आहे का याविषयी शंका आहे. “, असे म्हणत न्यायालयाने याचिककर्त्याच्या वकिलांना खडे बोल सुनावले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोफी अन्नान यांचे निधन

News Desk

गुलाम नबी आझाद यांचं कौतुक करताना पंतप्रधान झाले भावूक 

News Desk

BCCI ने भारतीय खेळाडुंचे तब्बल १० महिन्यांचे मानधन थकवले

News Desk