HW News Marathi
देश / विदेश

चिनी दूरसंचार उपकरणांच्या वापरावर तात्काळ बंदी, मोदी सरकारचा मोठा निर्णय

मुंबई | भारत सरकारने चीनी दूरसंचार उपकरणांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने दूरसंचार विभागाने बीएसएनएल आणि एमटीएनएलला आदेश देण्यात आले. सरकारी 4G यंत्रणेत चीनी उपकरणांचा वापर तात्काळ बंद करण्यास सांगितले आहे. सर्व मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर्सला चिनी उपकरणे हटवण्याचे आदेश भारत सरकारने दिले आले आहेत. जुने टेंडर रद्द करुन नवीन टेंडर जारी करा, ज्यात चीन कुठेही नसेल, असा आदेश सरकारी दूरसंचार कंपन्यांना देखील देण्यात आला आहे.

दरम्यान, लडाखमध्ये गलवान खोऱ्यात सुरू असलेल्या भारत-चीन सैन्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठा निर्णय घेतला आहे. १९ जून रोजी त्यांनी तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांची बैठक बोलवली आहे. ही बैठक व्हिडीओ कॉन्फन्सिंगद्वारे शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. या बैैठकीमध्ये भारत आणि चीनमधील गलवान खोऱ्यात सुरू असलेल्या वादावर चर्चा करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर चीनला भारतीय बाजारपेठेतून हद्दपार करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. देशभरात नागरिक देखील चिनी वस्तूंवर बहिष्कार करत आहेत. यातच सरकारने दूरसंचार क्षेत्रातील सरकारी आणि खासगी कंपन्यांना चिनी उपकरणं वापर-खरेदीवर बंदीचे आदेश दिले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई हल्ल्यामागचा म्होरक्या हाफिज सईदला १० वर्षांचा कारावास

News Desk

मालदीवने पंतप्रधान मोदींना ‘निशान इज्जुद्दीन’ सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले

News Desk

‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशी वागणूक केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळतेय!

News Desk