HW News Marathi
देश / विदेश

भारतीय सैन्याने आपली ताकद काय असते हे दाखवून दिले | मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई | “मी भारतीय वायू दलाचे आणि सैन्य दलाचे अभिनंदन करतो. भारतीय सैन्याने आपली ताकद काय असते हे दाखवून दिले. जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही”, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय वायू दलाच्या या कारवाईचे कौतुक केले आहे. भारतीय वायू दलाच्या ‘मिराज २०००’ या १२ लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषा पार करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये (एलओसी) असणाऱ्या दहशवाद्यांच्या तळावर तब्बल १००० किलो बॉम्ब टाकले असल्याची अत्यंत महत्त्वाचे वृत्त एएननाय या वृत्तसंस्थेने दिले आहे. दरम्यान अद्याप भारत सरकारकडून याला कोणत्याही प्रकारचा अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

प्राथमिक अंदाजानुसार या भारताने केलेल्या या हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदच्या ‘बालाकोट’ या दहशतवादी तळातील २०० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाला असल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून मिळत आहे. पाकिस्तानकडून मात्र हे सर्व अमान्य केले जात असून भारतीय हवाई दलाच्या विमानाने नियंत्रण रेषा ओलांडली मात्र आम्ही त्यांना थारा दिला नाही, असा बनावटी दावा केला जात आहे.

पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडून करण्यात आलेली ही अत्यंत मोठी आणि महत्त्वाची कारवाई असून देशभरातून या कारवाईचे आणि भारतीय वायू दलाचे कौतुक होत आहे. भारतीय वायू दलाच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची तातडीची बैठक सुरु झाली आहे. भारतीय वायू दलाच्या या कारवाईनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत भारतीय वायू दलाला सलाम केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता परदेशातही माल्ल्याच्या अडचणीत वाढ

Gauri Tilekar

पासपोर्टसाठी जन्माच्या दाखल्याची गरज नाही

News Desk

‘पक्षीय मतभेद जरूर असावेत पण मनभेद नसावेत’, रोहित पवारांनी केले मोदींचे कौतुक

News Desk