HW News Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीर | दहशतवाद्यांकडून अपहरण केलेल्या तीन पोलिसांची हत्या

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमध्ये तीन विशेष पोलीस अधिकारी आणि एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण करण्यात आले आहे. या चार ही पोलीस कर्मचारी बेपत्ता होण्यामागे दहशतवाद्यांचा हात आहे. यातील तीन पोलिसांची हत्या शुक्रवारी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. हे चार ही पोलीस कर्मचारी दक्षिण काश्मीर मधील शोपियान जिल्यातील होते.

या पोलीस कर्मचाऱ्यांना तुम्ही “राजीनामा द्या, देऊन ड्युटीवर जाऊ नका अन्यथा परिणाम भोगावे लागतील,” अशी धमकी दहशतवाद्यांकडून देण्यात आली होती. फिरदोस अहमद कुचे, कुलदीप सिंग, निसार अहमद धोबी, फयाज अहमद भाट अशी अपहरण करण्यात या पोलिसांचे अपहरण करण्यात आले होते. यातील फय्याज अहमद भाट यांची सुटका करण्यात आली आहे. या सर्व पोलिसांना कुटुंबीयांसमोरच बंदुकीचा धाक दाखवत अपहरण केल्याचे म्हटले जात आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून पोलिसांना टार्गेट केले जाते. दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरमधील पोलिसांच्या घरात घुसून कुटुंबीयांचे अपहरण गेले. भारतीय लष्कराकडून काश्मीरमध्ये शोध मोहिम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचे अपहरण करून खात्यावर दबाव आणण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणेंची केंद्रात वर्णी ,कसा आहे राणेंचा राजकीय प्रवास ?

Jui Jadhav

बाबरी मशीद प्रकरणी लालकृष्ण आडवाणींसह सर्व आरोपींना ३० सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश

News Desk

Cyclone Tauktae : गुजरातसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची १००० कोटींच्या मदत निधीची घोषणा!

News Desk