HW News Marathi
देश / विदेश

कोरोना लसीकरणाची मोहीम संपल्यानंतर CAA लागू करणार; अमित शाहांनी केले मोठे वक्तव्य

मुंबई | कोरोना लसीकरणाची मोहीम संपल्यानंतर नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी जाहीर केले आहे. शहांना भेटण्यासाठी आज (2 ऑगस्ट) पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी संसदेत पोहोचले होते. त्यावेळी सीएए लागू करणार असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती सुवेंदू अधिकारींनी दिली आहे.

दरम्यान, शहांनी पश्चिम बंगामधील कामाकाजसंदर्भात चर्चा केली असून कोरोना लसीकरण मोहीम संपल्यानंतर सीएए लागू करणार असल्याचे असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान तृणमूल काँग्रेसविरोधात सुवेंदू अधिकारी यांनी अनेक मुद्दे मांडले. यावेळी सुवेंदू अधिकारींनी तृणमूल काँग्रेसच्या भ्रष्टाचार करणाऱ्या 100 नेत्यांची यादी दिल्याचे सांगितले आहेत. संसदेत 11 डिसेंबर 2019मध्ये सीएए कायदा संमत करण्यात आला आहे.

सीएए म्हणजे काय

पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून धार्मिक छळाला कंटाळून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही. या लोकांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद या कायद्यात दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू काश्मीरमधील इंटरनेट बंदीचा सात दिवसांत आढावा घ्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

News Desk

आई मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, कदाचित या हल्ल्यात मी बचवणार नाही !

Gauri Tilekar

काश्मीरमध्ये ४ दहशतवाद्यांना कंठस्नान, १ जवान शहीद

News Desk