HW News Marathi
देश / विदेश

मतदार नोंदणीची तारीख ३० नोव्हेंबरपर्यंत करण्यात यावी !

मुंबई | समाजवादी पार्टीचे मुंबई/महाराष्ट्र अध्यक्ष अबू आसिम आजमी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदार नोंदणीची तारीख ३० नोव्हेंबर, २०१८ पर्यंत करण्यात यावी अशी मागणी केली आहे. अबू आजमी यांनी पत्रामध्ये लिहिले आहे कि निवडणूक आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या मतदार नोंदणी अभियानाला जनतेकडून समर्थन भेटत असून नवीन मतदार उत्साहाने मतदार यादीमध्ये नाव नोंदवीत आहेत.

या अभियानाला राजकीय पक्षासह अनेक सेवा भावी संस्थाचे हि सहकार्य मिळत आहे. आजमी ने निवडणूक आयोगाच्या अभियानाची प्रशंसा करत म्हणाले आहे कि अभियानामुळे कोणताही मतदार मतदानापासून नाही राहू शकत. परंतु अभियानासाठी ३१ ऑक्टोंबर, २०१८ पर्यंत ची वेळ देण्यात आली असून मात्र अभियान संपण्यासाठी ७ दिवस बाकी आहे पण अद्यापही काही मतदार नोंदणी करू शकले नाहीत. यासाठी अबू आजमी यांनी निवडणूक आयोगाला मागणी केली आहे. कि मतदार नोंदणीची तारीख वाढवून ३० नोव्हेंबर पर्यंत करण्यात यावी जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना मतदान यादीमध्ये नाव नोंद करता येईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सावरकरांप्रमाणे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नसून…”, संजय राऊतांचा मुख्यमंत्री-भाजपला टोला

Aprna

दहशतवादी आणि आपल्या गुप्तचर यंत्रणा एकसमान – माजी राॅ एजंट विनोद साहनी

News Desk

अडीचशे वर्ष जगलेल्या माणसाची कथा

News Desk