HW News Marathi
Covid-19

आम्हाला पाकिस्तान किंवा चीनची जमीन देखील नको !

मुंबई | देशात कोरोना रुग्णांची वेगाने वाढत आहे. तर लडाखच्या सीमेवर चीनने याठिकाणी युद्ध सराव करत भारताविरोधात आक्रमक रणनीती वापरत आहे. यामुळे भारती आणि चीन दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण सुरू आहे. तसेच दुसरीकडे पाकिस्तान देखील भारताच्या सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लघंन करत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “आम्हाला शांतता आणि अहिंसा हवी आहे. आणि आम्हाला पाकिस्तान किंवा चीनची जमीन देखील नको” अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

गुजरात जनसंवाद संमेलनात बोलताना गडकरी म्हणाले, “आपल्या देशाच्या एका बाजूला पाकिस्तान आहे. तर दुसऱ्या बाजूला चीन आहे. आम्हाला शांतता आणि अहिंसा हवी आहे. आम्ही कधीही भूतान किंवा बांग्लादेशाची जमीन बळगावण्याचा प्रयत्न केला नाही. आणि आम्हाला पाकिस्तान किंवा चीनची जमीन देखील नको, आम्हाल फक्त शांतता हवी आहे.”

“देशात कोरोनाचे संकट फार काळ टिकणार नाही. आपल्या देशातील वैज्ञानिक आणि जगातील शास्त्रज्ञ हे कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कोरोनावर लवकरच लस शोधली जाईल,” असा विश्वास गडकरी यांनी कार्यक्रमात बोलतना व्यक्त केला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साताऱ्यात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू

News Desk

देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान, पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा

News Desk

पुणे जिल्ह्यात १० दिवसांचा लाॅकडाऊन,काय चालु काय बंद जाणून घ्या

News Desk