HW News Marathi
देश / विदेश

आम्ही लोकशाहीसाठी लढणार आहोत! – के. चंद्रशेखर राव

मुंबई | तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राव यांनी आज (२० फेब्रुवारी) वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत भोजणाचा देखील आस्वाद घेतला. यानंतर दोघांनी भेट झाल्यानंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भाजप विरोधात वेगळी आघाडीची मोर्चे बांधणी असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. “आम्ही लोकशाहीसाठी लढणार आहोत,  असे म्हणत राव यांनी भाजप सरकारवर इशारा दिला आहे. राव पुढे म्हणाले, “महाराष्ट्रातून जे मोर्चा निघतो, खूप यशस्वी होतो. आम्ही दोघांनी देशाच्या राजकारणासंदर्भात चर्चा केली असून उद्धव ठाकरेंना हैदराबादला येण्याचे निमंत्रण दिले आहे,” असे त्यांनी पत्रकार परिषदे सांगितले. 

राव म्हणाले, “महाराष्ट्र आणि तेलंगणा हे दोन्ही भाऊ लागतात. कारण आम्ही हजार किलोमीटरची सीमा जोडली आहे. आम्ही देशातील आणखी काही नेत्यांशी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करणार आहोत. आम्ही लोकशाहीसाठी लढणार आहोत. आम्ही दोघांनी भारताला स्वांतत्र्य मिळून ७५ वर्षे झालीपासून आतापर्यंत देशातील परिस्थीवर बोललो आहोत. मला उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून खूप आनंद झाला आहे. उद्धव ठाकरेंना हैदराबादला येण्याचे आमंत्रण दिले आहे.” राव पुढे म्हणाले, भाजप केंद्रीय तपास यंत्रणंचा गैरवापर करत असून मी याचा निषेध करतो. केंद्र सरकारने आपली धोरणे बदलायला हवेत नाही तर त्यांना पुढे सर्व भोगावे लागणार आहे”

देशात सध्या सुडाचे राजकारण सुरू – उद्धव ठाकरे 

 “देशात सध्या सुडाचे राजकारण सुरू आहे. आमची तशी परंपरा नाही. सूडाचे राजकारण हे आमचे हिंदुत्वा नाही. देशाला परिवर्तनच्या मुद्यावर एकमत झाले आहे. आम्ही देशातील राजकारण विकासकामांवर चर्चा झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दुसऱ्या दिवशी राव यांची भेट झाली हे आमचे भाग्यच असून आमची ही सदिच्छा भेट होती,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण दोषी 

News Desk

पुढचे ३ महिने नागरिकांना गहू २, तर तांदूळ ३ रुपये प्रति किलोने मिळणार

News Desk

स्वातंत्र्य दिनाच्या आधी दिल्लीत भीतीचे वातावरण

swarit