HW News Marathi
Covid-19

राजधानी दिल्लीत विकेंन्ड कर्फ्यू, अरविंद केजरीवालांची घोषणा

नवी दिल्ली | देशातही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. राजधानी दिल्लीतही कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने दिल्लीत विकेण्ड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील जतनेशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असणार आहे. आधीपासूनच नियोजित लग्नासारख्या महत्वाच्या गोष्टींना कर्फ्यू पासच्या माध्यमातून परवानगी असेल असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

कर्फ्यूमध्ये सभागृह, मॉल, जीम आणि स्पा बंद असणार आहेत. तर चित्रपटगृहांना ३० टक्के प्रेक्षक क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी आहे. तसंच बाहेर जेवण्याला बंदी असून होम डिलिव्हरीची परवानगी आहे. आठवडी बाजारांना परवानगी आहे, मात्र त्यांना निर्बंधाचं पालन करावं लागेल. कर्फ्यूमध्ये लग्नासाठी जाणाऱ्यांना ई-पास दिला जाईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

“हे सर्व निर्बंध तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी आहेत. यामुळे थोडी अडचण होईल पण करोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी हे निर्बंध गरजेचे आहेत,” असं अरविंद केजरीवाल यांनी यावेळी सांगितलं. अरविंद केजरीवाल यांनी यावेळी लोकांना न घाबरण्याचं आवाहन करताना वीकेण्डला अत्यावश्यक सर्व सेवा सुरु राहतील असं सांगितलं आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात १७ कोटींची मद्यविक्री, उत्पादन शुल्क आयुक्‍तांचा अंदाज

News Desk

महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसला निर्णय घेण्याचा अधिकार नाही !

News Desk

टाटांनी पुन्हा मनं जिंकली! कोरोनामुळे कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतरही ६० वर्षांपर्यंत कुटुंबाला मिळणार वेतन

News Desk