HW News Marathi
देश / विदेश

सर्व समस्यांवर ऋषीमुनींचे वेद हाच उपाय!

नवी दिल्ली | “देशातील दहशतवाद, गुन्हेगारी आणि अनेक समस्या याला एकमेव उपाय म्हणजे फक्त संस्कृतमधील ऋषीमुनींचे वेद हाच आहे. तसेच देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्री यांनी आपल्या हातामध्ये वेद घेऊन शपथ घेतले हे स्वप्न मला पडले असे वक्तव्य केले आहे.” असे केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी दिल्लीमध्ये आज(२६ ऑक्टोबर)ला आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलनात बोलत होते. सत्यपाल सिंह यांनी भाषण करत असताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद देखील उपस्थित होते.
तेव्हढेच नाही तर मंत्री सत्यपाल सिंह यांनी भाषणावेळी वेदांचे महत्त्व सांगत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष देखील जेव्हा पदाची शपथ घेतो तेव्हा तो बायबल हा पवित्र ग्रंथ हातात घेतात, असे उदाहरण दिले.
त्यानंतर राष्ट्पती रामनाथ कोविंद यांनी म्हटले की, “थंडीत दिल्लीमध्ये प्रदूषणाने श्वास गुदमरतो. दिवाळीसारख्या सणांच्यादरम्यान फटाके न फोडता शांततेत सण साजरा करण्यासाठी सामाजिक संस्थानी जनजागृती निर्माण करावी असा सल्ला राष्ट्रपती यांनी दिला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

UP मध्ये 12 वीच्या अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळला; योगी आदित्यनाथांचा निर्णय

Aprna

महिलांची छेड काढणाऱ्या आरोपींचे भर चौकात फोटो लागणार !, योगी सरकारचा निर्णय

News Desk

तामिळनाडू – थर्मल प्लांटमध्ये बॉयलरचा स्फोट, ६ जणांचा मृत्यू, १७ जण जखमी 

News Desk