HW News Marathi
देश / विदेश

इटलीत बसून चर्चेत राहण्यासाठी ‘त्या’ कायदा सुव्यवस्थेवर बोलत आहेत !

नवी दिल्ली | “इटली किंवा इंग्लंडमध्ये बसून चर्चेत राहण्यासाठी काहीतरी करावे लागेल त्यामुळे काहींना काही गोष्टी करत राहणे पसंद आहे”, अशी बोचरी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केली आहे. प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या कायदा सुव्यवस्थेवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ बोलत होते.

“योगी सरकार हे अपराध्यांना शरण गेले आहे. येथे वारंवार गुन्हेगारी घटना घडत आहेत, गुन्हेगार उघडपणे वावरत आहेत. मात्र, भाजप सरकार याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे”, असे म्हणत प्रियांका गांधी यांनी “उत्तर प्रदेश सरकारने आत्महत्या केली आहे का ?”, असा संतप्त सवाल देखील उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी प्रियांका गांधींवर निशाणा साधला आहे.

“लोकसभेतील पराभव प्रियंका गांधींच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठ्या प्रमाणात अपयश आले आहे. म्हणूनच त्या उत्तर प्रदेशच्या कायदा सुव्यवस्थेवर बोलत आहेत. प्रियंका यांचे बंधू आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आपल्या अमेठी मतदार संघात पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे, इटली किंवा इंग्लंडमध्ये बसून चर्चेत राहण्यासाठी काहीतरी करावे लागेल यासाठीच प्रियंका ह्या उत्तर प्रदेशच्या कायदा सुव्यवस्थेवर बोलत आहेत”, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्टॅलिन यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

News Desk

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील ६० हून अधिक उमेदवारांना घवघवीत यश

Aprna

शोपियानमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk