HW News Marathi
व्हिडीओ

‘थोरातांनी जेवणासाठी बोलवावं, आम्ही येऊन स्वबळावर जेवू’ उद्धव ठाकरे काँग्रेसवर बरसले!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सध्या स्वबळाचा नारा लावला आहे. यावरून राज्यात सध्या महाविकासआघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान नाना पटोले यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री आपल्यावर पाळत ठेवत असल्याचं तसंच राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसला असल्याचं वक्तव्य लोणावळ्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीत केलं. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीत सहभागी असताना स्वपक्षाच्या सरकारवर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केल्याने त्यावर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांच्या स्वबळाच्या घोषणेवर प्रतिक्रिया देत टोला लगावला आहे. जलसंवर्धनाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा जलभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी “बाळासाहेब थोरात यांनी कोरोनाची भीती न बाळगता आम्हाला जेवण्यासाठी बोलवावं, आम्ही तुमच्याकडे येऊन स्वबळावर जेवू,” असा टोला लगावला. “चुकीचा अर्थ काढू नका नाहीतर उद्या जेवणावरुन आघाडीत बिघाडी असं व्हायचं, पण तसं काही नाही,” असं मिश्कील भाष्यही यावेळी त्यांनी केलं आहे.

#uddhavthackeray #nanapatole #balasahebthorat #congress #mahavikasaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Acid ची धमकी देत निकटवर्तीयाकडून वर्षभर तरुणीवर बलात्कार; Chembur मधील धक्कादायक प्रकार

News Desk

अबब ! भाजपला मिळाल्या ७५० कोटींच्या देणग्या… काँग्रेस, राष्ट्रवादीला किती ?

News Desk

“राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा”, Dhananjay Munde यांची मागणी

News Desk