HW News Marathi
व्हिडीओ

UNSC | पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नाला भारतीय राजदूताचे हजरजबाबी उत्तर

भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघाकडे धाव घेतली. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी याप्रकरणी विशेष सत्र बोलवण्याची विनंती संयुक्त राष्ट्राला केली होती. पाकने सुरक्षा समितीचा अध्यक्ष देश पोलंडला पत्रही लिहीलं होतं. या कामात पाकला नेहेमीप्रमाणेच चीनची साथ मिळाली आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत बंद दाराआड चर्चा व्हावी, अशी मागणी चीनने केली होती. शुक्रवारी हि संयुक्त राष्ट्रांची बैठक देखील पार पडली. मात्र, यात चीन आणि पाकिस्तानची निराशा झाली. कारण, या बैठकीत काश्मीरमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असल्याबाबत भारताचं कौतुक करण्यात आलं. या बैठकीबाबत अधिकृत प्रतिक्रिया जारी करण्यात आली नाही. दरम्यान, पाकिस्तनाच्या पत्रकारांसमोर संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे सैय्यद अकबरुद्दीन यांनी दाखवलेल्या हजरजबाबीपणाचे चांगलेच कौतुक होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

३१ डिसेंबर साजरा करताय? मग राज्य शासनाचे हे ‘१०’ नियम आधी पाहा!

News Desk

२७ एप्रिलला ठरणार ३ मेला लॉकडाऊन संपणार की वाढणार?

swarit

सरकारच्या घोषणा म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा?

News Desk