HW News Marathi
राजकारण

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला मोदींच्या कार्याचा गवगवा

गौतम वाघ

उल्हासनगर – आर पी आय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले त्यांच्या खाजगी कामानिमित्त १५ जानेवारी रोजी उल्हासनगर मध्ये आले होते ,या दरम्यान उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत कार्यकर्त्यांना अपेक्षित न बोलता नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री फडणविस व भाजपा सरकार च्या कामाचा उहापोह केला. उपस्थितांना आठवले आर पी आय चे की भाजपाचे असा प्रश्न पडला होता.

शहर आर पी आय अध्यक्ष भगवान भालेराव यांनी रिजन्सी सभागृह येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी गरीबांच्या हितासाठी केली आहे.ते मागासवर्गीयांच्या सवलती आणि राज्यघटना बदलनार नाहीत. भारतीय जनता पार्टी देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेसला हरवण्यासाठी भाजपा सोबत युती आर पी आय ने युती केली आहे. माझ्या मंत्री पदाच्या उर्वरित काळा च्या उपयोग समाजाच्या भल्यासाठी करणार तसेच गोव्यात आर पी आय निवडणुक लढवणार नसून फक्त भाजपा ला पाठिंबा देणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. तसेच भाजपा गुंडांना पक्षांना प्रवेश देत असलेल्या बाबत आठवले यांना पत्रकारांनी छेडले असता ,मी गुंडांच्या विरोधात आहे मात्र गुंड राजकारणात येऊन ते सुधरत असतील तर त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे मात्र त्यांना उमेदवारी दिली गेली नाही पाहिजे .असं मत आठवले यांनी व्यक्त केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…कारण ५६ इंचाची छाती असणारा चौकीदार चोर आहे !

News Desk

#Results2018 : मिझोराममध्ये काँग्रेसचे डिपॉझिट जप्त

News Desk

पूनम महाजन यांनी थेट ‘मातोश्री’ गाठले, युवासेनेच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

News Desk