HW News Marathi
राजकारण

ज्यांनी ५ वर्षे राज्याचं गृहखाते सांभाळले त्यांचाच सुशांत सिंह प्रकरणात पोलिसांवर विश्वास नाही हे दुर्दैवच – हसन मुश्रीफ

अहमदनगर | राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे. “ज्यांनी ५ वर्षे राज्याचं गृहखाते सांभाळले त्यांचाच सुशांत सिंह प्रकरणात पोलिसांवर विश्वास नाही. हे दुर्दैवी आहे, असे मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर मुंबईत आता सुरक्षित वाटत नाही असे ट्विट केले होते. त्यावरून अनेक टीका त्यांच्यावर केल्या गेल्या होत्या.

तसेच, हसन मुश्रीफ यांनी भाजप अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण करत असल्याचा आरोपही केला. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अहमदनगरला झेंडा वंदन पार पडले. यावेळी ते बोलत होते.“देवेंद्र फडणवीसांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. त्यानंतर त्यांना बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात येत आहे. हे राजकारण आहे. 5 वर्षे ज्यांनी गृहखातं सांभाळलं तेच आपल्या पोलिसांवर संशय व्यक्त करत आहेत हे दुर्दैव आहे.

“आपल्यासमोर सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हे आव्हान आहे. हा प्रादुर्भाव रोखणं, मृत्यूदर कमी करणं, जी अंत्यवस्थ रुग्ण आहेत त्यांना ताबडतोब बेड मिळतील अशी व्यवस्था करणं, जास्तीत जास्त रुग्णांना लवकर बरं करणं हेच आज आपल्यासमोरचं आव्हान आहे. यासाठी काम सुरु आहे,” असं मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ही योग्य वेळ नाही म्हणत लेखिका गीता मेहतांचा पद्मश्री स्वीकारण्यास नकार

News Desk

निरंजन डावखरे भाजपाच्या वाटेवर

News Desk

चौकीदाराच्या चोरीत आता सत्तेसाठी लाचार असलेली शिवसेना देखील भागीदार !

News Desk