HW News Marathi
राजकारण

सेना- भाजप युतीचं सत्य काय ?

मुंबई । लोकसभा निवडणुकीच्या तारखांची काही दिवसातच निश्चिती केली जाणार आहे. केंद्रातील सरकार आणि इतर पक्षांनीही तशी जोरदार तयारी सुरू केली आहे. पण महाराष्ट्रात काही बाबतीत संभ्रमाचीच स्थिती दिसून येत आहे. सेना आणि भाजप युतीबाबत हा संभ्रम निर्माण झाला आहे. तर महाराष्ट्रात युती होणार हे निश्चित असल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात आले आहे. मात्र त्या संदर्भातील पुर्ण चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

युती होणारच चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

गेल्या काही दिवसांपासून भाजप-सेना युती संदर्भातील चर्चांना उधान आले आहे. तशा चर्चा दोन्ही पक्षांकडून होतांना दिसून आल्या. मात्र आज (२५ जानेवारी)च्या ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तपत्रामधील बातमीनुसार एकाच पानावर युती संदर्भातील ३ वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या आहे. भाजपचे जेष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील सेना-भाजप कार्यकर्त्यांना युती हवीच आहे. तेव्हा युतीची घोषणा कधीही होऊ शकते.

मुख्यमंत्री युतीबाबत सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, लोकसभेसाठी काही जागा मागे पुढे झाल्या तरी चालतील पण विधानसभेसाठी सन्मानाने अर्ध्या जागा देण्यात यावा असा एक प्रस्ताव शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांना मिळाला आहे, त्यासाठी देवेंद्र फडणवीसांकडून विधानसभेसाठी अर्ध्या जागा देण्याची तयारीही दर्शवण्यात आली आहे. म्हणजेच फडणवीस युतीच्या बाबतीत सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे.

कुठलाही प्रस्ताव नाही- संजय राऊत

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या सर्व चर्चांना खासदार संजय राऊत यांनी काहीसा पुर्णविराम लावला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, युतीबाबतचा कोणताही प्रस्ताव नाही. युती म्हणजे काही मॅरेज ब्य़ुरो नाही. की, ते प्रस्ताव घेऊन येतील आणि आम्ही तो मुंडावळ्या लावून स्विकारायला बसल्यालो नाही. या सर्व घटनांमुळे महाराष्ट्रातील जनतेबरोबरच सेना आणि भाजपच्या नेत्यांमधे सुद्धा गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सेनेला हव्या ‘या’ ३ जागा

अशा या घडामोडी सुरू असतांनाच एच.डब्ल्यूच्या विशेष सुत्रांकडून खास माहीती मिळाली आहे. मात्र याला कुठलाही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहे. त्यापैकी १८ जागा शिवसेनेकडे तर २३ भाजपकडे आहे. शिवसेनेला अजून ३ जागा हव्या आहेत अशी माहीती मिळाली आहे. त्या ३ जागा म्हणज १ भिवंडी, १ पालघर आणि अजून एक जागा ज्याबद्दल अद्याप निश्चित माहिती मिळालेली नाही. या जागांवर सध्य परिस्थिती भाजपचे खासदार आहेत, आणि या जागा सेनेला हव्या आहेत.

विधानसभेमध्ये निम्म्या जागा सेनेला मिळाव्या यासाठी शिवसेना आग्रही आहे. विशेष म्हणजे, लोकसभा निंवडणुकानंतर सत्तेत आल्यावर ५ वर्षाच्या कार्यकाळात अडीच वर्ष सेनेचा मुख्यमंत्री असेल तर अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री. ही एक विशेष मागणी सेनेची असल्याची माहिती मिळत आहे. जेव्हा सेनेचा मुख्यमंत्री असेल तेव्हा भाजपचा उपमुख्यमंत्री आणि पुढचे अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री असतांना सेनेचा उपमुख्यंत्री राहील. असा ५ वर्षांचा कार्यकाळ कदाचित असू शकतो.

मोहन भागवत मध्यस्ती करतील ?

सुत्रांच्या म्हणण्यानूसार सर्वात महत्वाची बाब ही आहे की, या सर्व जागांबाबतची खात्री रा.स्व.सं चे सर्वेसर्वा मोहन भागवत यांच्याकडून शिवसेनेला देण्यात यावी. आता सर्व प्रकरणात भागवत मध्यस्ती करतील का? कदाचित नाही. तेव्हा या सर्व खेळीत महत्वाची भूमिका निभावू शकतात ते म्हणजे केंद्रिय मंत्री नितिन गडकरी. ते कदाचित या सर्व प्रकरणात मोठी भूमिका निभावू शकतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रचाराच्या तोफा शांत झाल्या आहेत !

News Desk

राहुल गांधींकडून डीआरडीओचे कौतुक अन् पंतप्रधान मोदींना ‘वर्ल्ड थिएटर डे’च्या शुभेच्छा !

News Desk

भाजपच्या विजयानंतर मोदी-शहांनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट

News Desk