HW News Marathi
राजकारण

जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे !

मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार ऐन रंगात आला आहे. याच पार्श्वभूमीवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. शनिवारी (१२ ऑक्टोबर) भिवंडी येथे झालेल्या मनसेच्या सभेत राज ठाकरे यांनी विविध मुद्दे उपस्थित केले आहेत. “मला जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे”, असे विधान यावेळी राज ठाकरे यांनी केले आहे.

• सगळेच सत्तेसाठी धावत आहेत पण राज्यात सक्षम विरोधी पक्ष नसेल तर सत्ताधारी वाट्टेल तसं वागतात आणि लोकांना चिरडतात.. आजची परिस्थिती अशी आहे की सरकार आणि पाऊस दोघेही झोडपत आहेत. पावसाची तक्रार करू शकत नाही पण सरकारची करू शकतो. त्यासाठी हवा सक्षम विरोधी पक्ष.

• १९८२ ला भिवंडीत मी पहिल्यांदा सन्मानीय बाळासाहेबांबरोबर आलो होतो आणि पुढे अनेकवेळा आलो. पण आज येताना खड्डे बघून प्रश्न पडला की तुम्हाला राग कसा येत नाही, मला असल्या हतबल लोकांचं नेतृत्व करायला आवडत नाही.

• गेल्या ५ वर्षात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण त्याचा आम्हाला राग येत नाही, निवडणुका म्हणजे फक्त धमाल सुरु आहे.

• भिवंडीतील यंत्रमाग व्यवसाय बंद पडतोय, देशात पण अनेक उद्योगधंदे पडत आहेत आणि आपण काहीच वाटून घेत नाही आहोत

• आज पीएमसी आणि सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे खातेदार आले होते, त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना काढता येत नाहीयेत, आज बँका बुडत आहेत, उद्योग बुडत आहेत, तरीही आपल्याला राग येत नाही, व्यवस्थेला जबाबदार धरावेसे वाटत नाही.

• शिवसेनेचे खासदार सिटी को-ऑपरेटिव्ह बँक चालवत आहेत, आणि बँक बुडल्यावर खातेदार भगिनी त्या शिवसेनेच्या खासदारांना भेटायला गेल्या तर ते म्हणाले मी ‘काही करू शकत नाही, मरायचं तर मरा.’

• भिवंडी मधील विजेचा प्रश्न, टोरेंट नावाची कंपनी गुजरात मधून आली, आणि तिने लुटायला सुरुवात केली आहे. भिवंडीकरांनी भाषणांना टाळ्या द्यायच्या ऐवजी एक टाळी टोरेंटच्या अधिकाऱ्याच्या गालावर मारली तर परिस्थिती सुधारेल.

• आज महाराष्ट्रात नाशिक वगळता सर्वत्र खड्डे आहेत. नाशिकमध्ये आपल्या सत्तेच्या काळात आम्ही टक्केवारी बंद केली आणि त्यामुळे रस्त्यांवर खड्डे नाही पडले. तेच कंत्राटदार होते जे आधीपण होते.

• राज्य सरकार ३०% सरकारी कर्मचाऱ्यांची कपात करणार असं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे. एकीकडे उद्योगधंदे बंद होत असल्याने खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्या जात आहेत आणि आता सरकारी पण. भाजपची घोषणा होती २०१४ ला कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, आज आम्ही विचारतोय कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र ?

• जे आधी विरोधी पक्षात होते तेच आता सत्ताधारी गोटात जाऊन बसले आहेत, जो पर्यंत हे दलबदलू हरणार नाहीत तो पर्यंत परिस्थिती सुधारणार नाही.

• चांगले रस्ते, चांगलं शिक्षण, चांगल्या पायाभूत सुविधा, अशा अनेक गोष्टी तुम्हाला हव्या असतील तर ही संधी आहे. ह्या सत्ताधाऱ्यांना घरी बसवा.

• आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात, गावात लोकांच्या मनात राग आहे पण हा राग कुठे व्यक्त करायचा हे काळात नसेल तर आम्ही लोकांना आवाहन करतोय की आम्हाला सक्षम विरोधी पक्ष म्हणून निवडून येण्यासाठी मतदान करा. रस्त्यावरचा विरोधी पक्ष म्हणून आम्ही होतोच आता विधानसभेतील विरोधी पक्ष म्हणून काम करायचं आहे.

• माझे उमेदवार जेंव्हा निवडून येतील तेंव्हा त्यांच्यावर माझा अंकुश असेल आणि माझे विधानसभेतील आमदार सरकारवर अंकुश ठेवतील. माझा महाराष्ट्राकडे बघायचा दृष्टिकोन आहे; जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॉंग्रेसने जनतेला मुर्ख बनविले

News Desk

९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला कोरोनामुळे स्थगिती…!

Arati More

#MarathaReservation : मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची विधेयकात तरतूद

News Desk