HW News Marathi
राजकारण

राज ठाकरेंच्या फक्त सभांना गर्दी, पण मते आम्हालाच !

मुंबई । विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचाराला, सभांना आता सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या प्रत्येक सभेला असणारी प्रचंड गर्दी आणि प्रतिसाद हा कायमच चर्चेचा विषय ठरतो. राज यांच्या या सभांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून आता रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज ठाकरेंच्या फक्त सभांना गर्दी होते. पण लोकांची मते मात्र आम्हालाच मिळतात”, असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांनी राज्यभर प्रचारसभा घेत पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि मोदी सरकारवर सडकून टीका केली होती. राज यांच्या सभांना प्रतिसाद देखील प्रचंड होता. मात्र, त्याचे मतांमध्ये रूपांतर होऊ शकले नाही. हा धागा पकडत रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज ठाकरेंच्या फक्त सभांना गर्दी होते. त्यांना मते मिळत नाही. लोकांची मते मात्र आम्हालाच मिळतात”, असे रामदास आठवले म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमच्या तिघांचा त्रिशूळ सर्व प्रश्न मार्गी लावेल !

News Desk

आढळराव पाटलांना शिरूर मतदारसंघ सोडावा लागणार?

Manasi Devkar

MannKiBaat : विद्यार्थ्यांनी तयार केलेला उपग्रह ‘कलाम सॅट’ची अंतराळात झेप

News Desk