HW News Marathi
राजकारण

अफवेमुळे बळी गेलेल्या त्या पाच जणांच्या कुटुंबाला प्रत्येकी 50 हजारांची मदत

पंढरपूर |मुले पळविणारी टोळी गावात आली असल्याच्या अफवेमुळे धुळे जिल्ह्यातील राईलपाडा या गावात पाच नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या निरपराधांना जमावाने ठेचून ठार मारण्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. त्यातील पाच मृतांच्या मूळगावी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील खवे या गावात आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट देऊन आरपीआय तर्फे पाचही मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 हजारांची सांत्वनपर मदत केली . यावेळी रिपाइं चे राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे तसेच तालुका अध्यक्ष अशोक शिवशरण जितेंद्र बनसोडे; नगरसेवक डी राजसर्वगोड; संतोष पवार किर्तीपाल सर्वगोड प्रवीण माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सोशल मीडियात अफवा पसरवण्याची दूषप्रवृत्ती वाढीस लागली आहे. त्यातून देशात अफवेमुळे निरपराधांचे बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. हे प्रकार रोखले पाहिजेत. सोशल मीडियातील अफवा रोखल्या पाहिजेत. समाजाने ही शहानिशा करून पाऊल उचलले पाहिजे. कोणीही कायदा हातात घेता कामा नये. मुले पालविणारी टोळी या अफवेमुळे निरपराधाना ठार करणे ही अत्यंत निंदनीय गंभीर घटना आहे. धुळे येथे ज्यांनी कायदा हातात घेऊन 5 जनांची निर्घृण हत्या केली त्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे. पुन्हा अश्या घटना घडू नयेत या साठी या गुन्ह्यातील आरोपींना कठोरात काठोर शिक्षा करावी अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गौतम गंभीर पुन्हा अडचणीत, परवानगीशिवायच घेतली प्रचारसभा

News Desk

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी पुकारला बंद, वाहतूक विस्कळीत

News Desk

मोदीजी ही तर जनतेची थट्टा

News Desk