HW News Marathi
राजकारण

‘मविआ’ सरकारने मंजूर केलेल्या प्रस्तावाचा GR राज्यपालांनी मागवला

मुंबई | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोनावर मात केली. यानंतर राज्यपाल पुन्हा कामावर रुजू झाले होते. राज्यात गेल्या आठ दिवसापासून राज्यात सत्ता संघर्ष सुरू आहे. राज्यपाल कोरोनावर उपचार घेत असताना महाविकास आघाडी सरकारने अनेक फाईल्स आणि प्रस्ताव मंजूर करून घेतला आहे. राज्यपाल रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर त्यांनी 22 ते 25 जून या तीन दिवसांत मंजूर करण्यात आलेले फाईल्स आणि प्रस्ताव मंजूर करण्यात आलेल्या जीआरची सविस्तर माहिती राज्यपालांनी मागवली आहे.

दरम्यान, राज्यातील राज्यपालांच्या अनुपस्थिती महाविकास आघाडी सरकारने फाईल्स आणि प्रस्ताव मंजूर करण्यात आल्या आहेत. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेत राज्यपालांना पत्र लिहिले आहे. राज्यपालांनी दरेकरांच्या पत्राची दखल घेत गेल्या तीन दिवसात मंजूर करण्यात आलेल्या फाईल्स आणि प्रस्ताव मंजूर गेलेल्या सर्वांचा जीआर मागविला आहे. महाविकास आघाडी सरकारने काढलेल्या जीआरवर बंद घालण्याची मागणी दरेकरांनी त्यांच्या पत्रातून केली आहे.

शिवसेनेतील बंडखोर नेता एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह 50 आमदारांनी बंडखोरी केली आहे. सध्या हे बंडखोर आमदार गुवाहाटीमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी, केंद्र सराकर आणि विधीमंडळाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांना पाच दिवसांत आपली बाजू मांडण्याची नोटीस सर्वोच्च न्यायालयाने पाठविली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 12 जुलै रोजी होणार आहे.  न्यायालयात  बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठविल्या विरोधातात  सर्वोच्च न्यायालयात काल (27 जून) सुनावणी पार पडली.

संबंधित बातम्या
राज्यपालांना चार दिवसांनंतर रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“… माझ्यावर हल्ला करण्याचा कट”, संजय राऊतांचा गंभीर आरोप

Aprna

राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर १० दिवसात शेतकऱ्यांचे कर्जमाफ

News Desk

मोदी दर दोन-तीन दिवसांआड महाराष्ट्रात येत आहेत, राजकीय हवा बदलत आहे !

News Desk