HW News Marathi
राजकारण

कलम ३७० हटविल्यानंतर काश्मीर खऱ्या अर्थाने भारतात विलीन झाले !

मुंबई | “काश्मीरमध्ये तिरंगा फडकावून पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी तिरंग्याला आन-बान-शान मिळवून देण्याचे काम केले आहे”, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारच्या कलम ३७० रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले आहे. “काश्मीरमध्ये तिरंगा फडकविण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी यांनी आंदोलन केले होते. आता अखेर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी हे स्वप्न पूर्ण करून दाखवले आहे. कलम ३७० रद्द करण्याच्या सरकारच्या ऐतिहासिक निर्णयानंतर या स्वातंत्र्यदिनी जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये भारताचा तिरंगा फडकला आहे”, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कलम ३७० संदर्भातील सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज (२२ सप्टेंबर) मुंबई दौऱ्यावर आहेत. काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या ऐतिहासिक निर्णयासंदर्भात रविवारी अमित शाह यांचे गोरेगावमधील नेस्को संकुलात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शनिवारी (२१ सप्टेंबर) निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेची तारीख जाहीर केली. त्यामुळे अमित शहांचा हा कार्यक्रम राज्यात निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्षाच्या निवडणूक प्रचारातील पहिला कार्यक्रम ठरला. “१९४७ साली काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाले असले तरीही कलम ३७० हटविल्यानंतर खऱ्या अर्थाने काश्मीर भारतात विलीन झाले आहे”, असे म्हणत यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोदी सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर काँग्रेसमध्ये एकही माणूस शिल्लक राहणार नाही !

News Desk

राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांबद्दल सेहवागने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

आता आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा खटाटोप

News Desk