HW News Marathi
राजकारण

भारत मोदी मुक्तीसाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे | राज ठाकरे

मुंबई | “२०१४ मध्ये मोदींने काँग्रेस मुक्तीची घोषणा दिली होती, त्यानंतर त्यांना लोकांनी मते दिल्यानंतर मोदी सत्तेत आली. आता भारत मोदी मुक्त करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे,” असे आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पाडवा मेळाव्यात सर्वांना केले आहे.

“भारताला १९४७ साली स्वतंत्र्य मिळाले, १९७७ साली आणबाणीतून दुसरे स्वातंत्र्य, २०१९ मध्ये तिसऱ्यांदा मोदीमुक्ती भारत करायचे आहे.” असे म्हटले होते. पुढे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्गातील मॉनिटर आहेत. जे फक्त शिक्षकांचे आवडते असतात. पण, ते विद्यार्थ्यांना आवडत नाहीत.

तसेच श्रीदेवी यांनी असे काय केले होते. की, त्यांचा मृतदेह तिरंग्यामध्ये गुंडाळण्यात आला असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केले. तर दुसरीकडे अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ हे सिनेमे भाजपने स्पॉन्सर केल्याचा आरोप देखील ठाकरे यांनी केला आहे. ठाकरे यांनी मोदीबरोबरच शाहा यांच्यावर सभेत या दोघांवर तोफ डागली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या खासदारांना व्हीप जारी

News Desk

#Elections2019 : जाणून घ्या…अमरावती मतदारसंघाबाबत

News Desk

राजदंड पळविण्याच्या प्रयत्न, विधानसभेचे कामकाज पुन्हा तहकूब

News Desk