HW News Marathi
राजकारण

शिवसेनेच्या ५६ विजयी आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक

मुंबई | राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्यात शिवसेना मोठी भूमिका बजावू शकेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या ५६ विजयी आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. त्यामुळे, शिवसेनेच्या या बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. ‘अबकी बार २२० पार’चा नारा देणाऱ्या भाजपला फार मुश्किलीने १०० चा आकडा पार करणे शक्य झाले आहे. तर अनेक ठिकाणी महाघाडीमुळे भाजपला धक्का बसला आहे.

यंदाच्या विधानसभेत राज्यात भाजप १०५ तर शिवसेनेला ५६ जागांवर समाधान मानावे लागले आहे.राज्यातील विधानसभेकरिता भाजपकडून “अबकी बार २२० पार” इतकंच नव्हे तर विधानसभेच्या मतदानादिवशी “अबकी पार २२० नव्हे तर अबकी बार २५० टच” असा नारा दिला देण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात भाजपला यंदाच्या निवडणुकीत खूप मुश्किलीने १००चा आकडा पार करता आला आहे. एकीकडे भाजपची अशी स्थिती असताना दुसरीकडे राज्यात राष्ट्रवादीला जनतेने दिलेला कौल पाहता राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी असही समीकरण पाहायला मिळू शकते, अशाही जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राममंदिर’ विषयावर हवे तसे बोलणारे वाचाळवीर भाजपातच !

News Desk

RamMandir : महाराष्ट्र ते अयोध्या रामसेतू | सामना

News Desk

२०१४ मध्ये अशा झाल्या होत्या लोकसभा निवडणुका

News Desk