HW News Marathi
राजकारण

भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल ही कोणा एकाची वैयक्तिक नाही !

नवी दिल्ली | भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल ही कोणा एकाची वैयक्तिक नाही, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. पुढे राहुल गांधी असे देखील म्हणाले की, सर्जिकल स्टाईक हे भारतीय लष्कर केले आहे, मोदींनी नाही. मोदी सर्जिकल स्ट्राईक त्यांच्या सरकारने केल्याचे सांगत लष्कराचा अपमान केला असल्याचे राहुल गांधींनी आज (४ मे) घेतलेल्या पत्रकार परिषेदत म्हटले आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होणार असल्याचा विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केला आहे. भाजप सरकारने २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन पूर्ण केले नाही. याबद्दल मोदी सरकार काही बोलत नाही. मोदी सरकारने केलेली नोटाबंदी फसली असून याला काँग्रेसची न्याय योजना याला उत्तर देणार असल्याचा दावा राहुल गांधी व्यक्त केला आहे. या न्याय योजनेद्वारे गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार असल्याचे राहुल गांधींनी सांगितले.

याचबरोबर, मसूद अझहरला भाजपने देशाबाहेर सोडले, असा आरोप करत मसूद अझहर हा दहशतवादी आहे, त्याच्याविरोधात कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी, असे राहुल गांधी म्हणाले. याशिवाय, देशातील निवडणूक आयोग पूर्णपणे एकांगी असल्याचाही आरोप राहुल गांधी यांनी केला.

गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही, ते घाबरतात. दबाव आला की, नरेंद्र मोदी पळून जातात, असा त्यांचा स्वभाव आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. तसेच, देशाचा पंतप्रधान कोण असेल, या प्रश्नावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, ‘देशाचे लोक जे ठरवतील, तो पंतप्रधान मला मान्य असेल, मात्र सध्या माझे काम हे देशाच्या संस्थांना वाचवणे आहे.’ चौकीदार चोर है, या वक्तव्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात फक्त नाऱ्याबद्दल माफी मागितली आहे. असेही राहुल गांधी म्हणाले. तसेच राफेल करारातून चौकीदाराने ३० हजार कोटींची चोरी केल्याचा आरोपही नरेंद्र मोदींवर केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारच्या नोटाबंदी-जीएसटीमुळे देशात आर्थिक मंदी !

News Desk

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून होणार; ‘या’ तारखेला सादर होणार अर्थसंकल्प

Aprna

प्रवीण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk