Site icon HW News Marathi

“रडायचे नाही तर लढायचे…”, संजय राऊतांनी पत्राद्वारे मित्रपक्षांचे मानले आभार

मुंबई | पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl case) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पीएमएलए न्यायालयने 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. राऊतांनी काँग्रेसचे राज्यसभेतील गटनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह आणि इतर मित्रपक्षांनी त्यांना पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीवर राऊतांनी सर्व विरोधकांचे आभार मानण्यासाठी पत्र लिहिले आहे. “रडायचे नाही तर लढायचे, हीच शिकवण बाळासाहेबांनी आम्हाला दिली,” असे म्हणत राऊतांनी पत्रातून आभार मानले आहे.

 

राऊतांनी पत्रात म्हणले, “आयुष्याच्या सर्वात कठीण काळात आपले मित्र कोण असतात हे स्पष्ट होते. माझ्याविरोधात सुरू असलेल्या राजकीय सूड नाट्यातील तुमच्या पाठिंब्यामुळे मी आभारी आहे. सत्यासाठी माझा लढा सुरूच राहिल. कितीही दबाव आला तरी लढा सुरूच ठेवेन. दबावाला बळी पडणार नाही. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, रडायचे नाही, तर लढायचे…,” असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. राजकीय सूडबुद्धीने तपास यंत्रणांद्वारे कारवाई केली जात असल्याचे राऊतांनी पत्रातून सांगितले आहे.

 

नेमके काय आहे प्रकरण

 

मुंबई येथील गोरेगावमध्ये पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. यात राऊतांचे निटकवर्तीय प्रवीण राऊत यांची गुरु आशिष कन्स्टरक्शन कंपनीला या चाळचा विकास करण्याचे काम देण्यात आले होते. या चाळीच्या जागेचा काही भाग त्यांनी खासगी बिल्डरला विकल्याचाआरोप राऊतांवर केला आहे. प्रवीण राऊतांनी पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. प्रवीण राऊतांनी चाळतील 3 हाजार फ्लॅट बांधकाम सुरू होते. यापैकी 672 फ्लॅट चाळीतील लोकांना द्याचे होते. तर त्या व्यतिरिक्त म्हाडा आणि विकासक यांना वाटून घ्याचे होते. पण 2010 मध्ये प्रवीण राऊतांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएल कंपनीला विकले. यानंतर पत्राचाळी भूखंड 2011, 2012 आणि 2013 अनेक खासगी बिल्डर्सना हस्तांतरित केला.

संबंधित बातम्या
संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत सुनावली ED कोठडी
Exit mobile version