HW News Marathi
राजकारण

विधानसभेपूर्वी प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरेंची भेट घेणार !

मुंबई | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आपण येत्या विधानसभा निवडणुकांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने या सर्व पक्षांसोबत राहावे अशी इच्छा असून आपण त्यासाठी प्रयत्न देखील करणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी यावेळी दिली आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते. नुकतीच राष्ट्रवादीचे मावळचे विजयी खासदार अमोल कोल्हे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. लोकसभेत झालेल्या चुका टाळून विधानसभेसाठी तयार होण्याकडे आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न सुरु केले आहेत.

राजू शेट्टी यांनी यावेळी आपल्या लोकसभेतील पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले आहे. “लोकसभेत शेतकऱ्यांनी मते दिली पण ती यंत्रातून आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही. त्यामुळे मतदान यंत्रावर आमचा विश्वास नाही”, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मतविभाजनाचा मोठा फटका बसला. त्यामुळे लोकसभेत झालेली ही चूक विधानसभेत टाळण्याचा प्रयत्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून निश्चितच करण्यात येईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज त्यावर फक्त शिक्कामोर्तब होईल इतकेच!

News Desk

मुख्यमंत्री जलयुक्तवरील खर्च झालेल्या साडेसात हजार कोटींचा हिशोब द्या | धनंजय मुंडे

News Desk

“48 तासात प्रकरण पूर्ण संपले नाही तर…”, शरद पवारांचा इशारा

Aprna