HW News Marathi
राजकारण

‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ योजनेचा ५६% निधी प्रसिद्धीवर खर्च

नवी दिल्ली | ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ या योजनेसाठी देण्यात आलेल्या एकूण निधीपैकी तब्बल ५६% निधी हा प्रसिद्धीवर खर्च करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून या योजनेकडे पहिले जाते. या योजनेसाठी सरकारने कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद केली. मात्र या निधीपैकी तब्बल ५६ टक्के निधी हा केवळ प्रसिद्धीसाठी वापरण्यात आला आहे. महिला आणि बालविकास, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, मनुष्यबळ विकास या तीन मंत्रालयांकडून ही योजना राबवली जाते.

पंतप्रधान मोदींनी २२ जानेवारी २०१५ रोजी ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ योजनेची घोषणा केली. या योजनेकरिता देण्यात आलेल्या निधीपैकी तब्बल ५६ टक्के निधी प्रसिद्धीवर खर्च झाला तर राज्य आणि जिल्हा पातळीवर या एकूण निधीपैकी केवळ २५ टक्के निधी देण्यात आला आहे. या निधीपैकी १९ टक्के निधी खर्चच करण्यात आलेला नाही.

सरकारने ६४० जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात आल्या असून सरकारने पहिल्या टप्प्यात स्त्री-पुरुष यांचा जन्मदर अतिशय कमी असलेल्या १०० जिल्ह्यांची निवड केली होती. तर दुसऱ्या टप्प्यात आणखी ६१ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आल्याची माहिती विरेंद्र कुमार यांनी दिली आहे.सरकारची ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ ही योजना अपयशी ठरली आहे का ?, असा प्रश्न संसदेत खासदारांकडून विचारण्यात आल्यानंतर त्या प्रश्नाला उत्तर देताना महिला आणि बालविकास राज्यमंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात सर्व जागांवर भाजपचा दावा, मग शिवसैनिकांनी फक्त झेंडेच उचलायचे का ?

News Desk

राज्यातील सत्तांतरावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू; आज आणि उद्या शिंदे गटाचा युक्तीवाद

Aprna

विधानभवनावर पोहचण्याआधीच ओला-उबर चालकांना पोलिसांनी रोखले

News Desk