HW News Marathi
राजकारण

सातरच्या गादीसमोर काँग्रेसचे “पृथ्वीअस्त्र” भयभीत होऊन पळाले !

सातारा | केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काहीच दिवसांपूर्वी आगामी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २१ ऑक्टोबरला राज्यात विधानसभेकरिता मतदान प्रक्रिया पार पडेल तर २४ ऑक्टोबरला निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. दरम्यान, विधानसभेसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक देखील पार पडणार आहे. या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून माजी खासदार आणि माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी उद्यनराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव पुढे येत होते. मात्र त्यानंतर चव्हाण यांचे नाव मागे पडले. याच पार्श्वभूमीवर, भाजप नेते आशिष शेलार यांनी आघाडीवर निशाणा साधला आहे.

“सातरच्या गादीसमोर काँग्रेसचे “पृथ्वीअस्त्र” भयभीत होऊन पळाले”, असे म्हणत आशिष शेलार यांनी काँग्रेससह पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. “जय जय महाराष्ट्र माझा…गर्जा महाराष्ट्र माझा! उदयनराजे छत्रपतींचे वंशज तुम्ही विरोधकांना पराभवाचे पाणी पाजा! सातरच्या गादीसमोर काँग्रेसचे “पृथ्वीअस्त्र” भयभीत होऊन पळाले..भाजपचे विरोधक सारे गारद झाले. दिल्ली..अमेरिकेच्या तख्तापर्यंत गरजतात सारे!गरजा महाराष्ट्र माझा!”, असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे. पृथ्वीराज चव्हाण हे सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत उद्यनराजेंविरोधात लढणार असल्याचे वृत्त होते. मात्र, त्यानंतर आघाडीकडून या पोटनिवडणुकीकरिता चव्हाण यांचे नाव मागे पडून श्रीनिवास पाटील यांच्या नावाची निश्चिती करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानभवनाच्या परिसरात नितेश राणे-अबू आझमी ‘लव्ह जिहाद’च्या मुद्द्यावरुन आमने-सामने

Aprna

महानुभाव संमेलनात एकनाथ खडसे एकटे; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

…म्हणून राज ठाकरेंनी पवारांच्या नादी न लागता विधानसभा स्वबळावर लढवावी !

News Desk