HW News Marathi
राजकारण

भाजपच्या शेवटाची सुरूवात, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

मुंबई | गोरखपूरच्या पोटनिवडणुकीने अहंकार व उन्मत्तपणाचा पराभव केला आहे. भारतीय जनता पक्षाला हवेतून खाली आपटणारे हे निकाल आहेत. ही तर खरी मोदींच्या सत्तेच्या अंताची सुरूवात आहे. मित्रांना दूर लोटले व खोटय़ाचा मार्ग स्वीकारला की नशिबी पराभवाचे गोटे येतात.

कोसळणे सुरू होते तेव्हा कोणतेही चाणक्य पडझड रोखू शकत नाहीत. 2019 साली भाजपचा आकडा 280 राहणार नाही तर किमान 100 ते 110 जागांची घसरगुंडी होऊन त्या 170 पर्यंत खाली येतील असे भाकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्तविले आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पोटनिवडणुकीचे निकाल बुधवारी आले. यात भाजपचा दारूण पराभव झाला. फुलपूर आणि अरिरिया लोकसभा मतदारसंघात तर भाजपचा 50 हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला तर गोरखपूरची जागा 29 वर्षानंतर 22 हजार मतांनी गमावली.

अखिलेश यादव, मायावती आणि लालूप्रसाद यांनी मोदी-शहांच्या भाजपला चांगलाच झटका दिला आहे. सध्या याची देशभर चर्चा असताना भाजपचा मित्रपक्ष असलेला, राहिलेल्या शिवसेनेने त्यांना झोडपण्याची संधी सोडली नाही. सामनात अग्रलेख लिहून उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात पोलिसांना यश

Chetan Kirdat

#LokSabhaElections2019 : उर्मिला मातोंडकर आज काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

News Desk

व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे अडचणीत आल्या किरण खेर आयोगाने पाठविले नोटीस

News Desk