HW News Marathi
राजकारण

भाजपकडून लोकांचा कौल बदलण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात !

नवी दिल्ली | मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी २८ नोव्हेंबरला मतदान झाले. मात्र काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आता या मतदानाबाबत एक वेगळीच भीती व्यक्त केली आहे. “भाजपला आपला पराभव होणार हे कळून चुकले आहे. त्यामुळे भाजपकडून लोकांचा कौल बदलण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात”, अशी भीती ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणी तातडीने कठोर पावले उचलून दोषींवर कारवाई करून इव्हीएमच्या सुरक्षेची खबरदारी घ्यावी, असे सिंधिया यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/JM_Scindia/status/1068762393671536640

ज्या स्ट्राँग रूममध्ये या इव्हीएम मशीन्स ठेवण्यात आल्या आहेत त्या रूमला कडेकोट सुरक्षा देण्यात यावी, अशी सूचना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. भोपाळमधील स्ट्राँग रूमच्या बाहेर लावलेली एलइडी बंद पडणे, सागर जिल्ह्यात गृहमंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघात राखीव इव्हीएम मशीन तब्बल ४८ तास उशिरा पोहोचणे, सटणा-खरगोन येथे अज्ञात बॉक्समधून इव्हीएम स्ट्राँग रूममध्ये नेण्यात येत असल्याचा व्हिडीओ हे सर्व एका मोठ्या षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप सिंधिया यांनी ट्विटरवरून केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसने दिग्गज नेत्यांमधील वाद सोडविण्यासाठी नेमली त्रिसदस्यीय समिती

Gauri Tilekar

नरेंद्र मोदी ३० मे रोजी घेणार पंतप्रधानपदाची शपथ

News Desk

कल्याण-डोंबिवली महापालिकेत मोठी बाचाबाची

Gauri Tilekar