HW News Marathi
राजकारण

भाजप-काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू !

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या किमान उत्पन्न हमी योजनेच्या घोषणेवरून बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे. “भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकसारखेच आहेत. दोन्ही पक्ष दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अयशस्वी ठरली आहेत. हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत”, असे मायावती म्हणाल्या.

“राहुल गांधींनी इंदिरा गांधींच्या ‘गरिबी हटाव’ घोषणेसारखे नुसते आश्वासन दिले. तर भाजपने देशातील प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख येण्याचे, देशात ‘अच्छे दिन’ आणण्याचे आश्वासन दिले. मात्र हे दोन्ही पक्ष दिलेली आश्वासने पूर्ण करण्यास अपयशी ठरले. म्हणून काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत”, असे मायावती म्हणाल्या.

मायावती यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिलेल्या किमान उत्पन्न हमी योजनेच्या घोषणेची तुलना इंदिरा गांधींच्या ‘गरिबी हटाव’ घोषणेशी केली आहे. त्याचप्रमाणे अशी आश्वासने देण्यापेक्षा राहुल गांधींनी गांधींनी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये योजनांची अंमलबजावणी करावी, असा सल्लाही मायावती यांनी दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई उच्च न्यायालयाच्या जामीन अर्जाच्या आधारे अनिल देशमुख यांनी CBI न्यायालयाचा दरवाजा ठोठावला

Aprna

आमची ५ वर्षे विरोधकांची रखडलेली काम करण्यातच गेली !

News Desk

ओवेसी वाट्याची भाषा करत असतील तर ….!

News Desk