HW News Marathi
राजकारण

…तर असे सरकार कशाला चालवायचे ?, फडणवीसांचा शिवसेनेवर घणाघात

मुंबई | विधानसभेचे निकाल लागल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला पेच अद्याप सुटू शकलेला नाही. महायुतीचे दोन्ही महत्त्वाचे पक्ष असणाऱ्या भाजप-शिवसेना मुख्यमंत्रीपद आणि सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्यावरून मागे हटण्याचे नाव घेत नाहीये. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील घडामोडींना देखील चांगलाच वेग आला आहे. उद्या (९ नोव्हेंबर) महाराष्ट्रातील फडणवीस सरकारचा कार्यकाळ संपणार असून त्याच्या एक दिवसपूर्वीच आज (८ नोव्हेंबर) नुकताच देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी भाजप नेते आशिष शेलार, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, गिरीश महाजन देखील यावेळी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे ?

  • राज्यपालांनी माझा राजीनामा स्वीकारला आहे
  • गेली ५ वर्षे जनतेने सेवेची संधी दिली
  • पारदर्शक, प्रामाणिक महाराष्ट्राचे सरकार आम्ही चालवले.
  • महाराष्ट्राच्या जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो
  • आम्ही राज्यातील वेगवेगळ्या संकटांचा सामना केला.
  • आमच्यासोबत असलेल्या शिवसेनेचेही आभार. पण ते आमच्यासोबत होते कि नाही माहित नाही, शिवसेनेला टोला
  • महाराष्ट्राला सर्व आघाड्यावर पुढे नेण्याचे काम केले.
  • गेल्या ५ वर्षात प्रचंड मोठे काम या महाराष्ट्रात झाले.
  • लोकसभेतही महाराष्ट्रात पक्षाला मोठे यश मिळाले
  • विधानसभेतही लोकांनी महायुतीला संपूर्ण बहुमत दिले.
  • भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून विधानसभेत निवडून आला.
  • आम्ही लढलेल्या जागांपैकी ७०% जागांवर लोकांनी आम्हाला विजय मिळवून दिला
  • विधानसभेच्या निकालानंतर ‘सत्तास्थापनेसाठी आमचे सर्व पर्याय खुले’, हे उद्धव ठाकरेंचे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी
  • अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा माझ्यासमोर कधीही निर्णय झालेला नव्हता. उलट या मुद्द्यावर आमची बोलणी फिस्कटून थांबविण्यात देखील आली होती.
  • आम्ही असा कोणताही शब्द दिला नव्हता.
  • असे काही बोलणं अमित शहांसोबत झाले असेल तर त्याची मला कल्पना नाही.
  • दिवाळीवेळी अनौपचारिक चर्चेत मी हे स्पष्ट सांगितले होते
  • भाजपने प्रामाणिकपणे आमची भूमिका मंडळी
  • या समाज-गैरसमजांवर चर्चेतूनच यावर मार्ग निघणे शक्य होते. मात्र, आम्ही चर्चाच करणार अशी भूमिका त्यांच्याकडून घेण्यात आली.
  • उद्धव ठाकरेंनी एकही फोन घेतला नाही.
  • चर्चा शिवसेनेने थांबविली. आमच्याकडून चर्चेची दारे खुली होती.
  • भाजपशी सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत, त्यांच्या नेत्यांसोबत रोज दिवसांतून ३-३ वेळा चर्चा होत होती, संजय राऊतांना टोला
  • आम्हाला भाजपशी नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच चर्चा करायची अशी शिवसेनेची भूमिका होती. हे योग्य नाही.
  • आजूबाजूच्या लोकांना मात्र यात मीडिया स्पेस मिळाली, संजय राऊतांना टोला
  • त्यांची आघाडीसोबत जाण्याची मानसिकता होती.
  • आम्ही जोडणारे, तोडणारे नाही.
  • बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी वंदनीयच
  • बाळासाहेबांविरुद्ध एकही वक्तव्य आम्ही केलेले नाही.
  • ज्या भाषेत बोललं जातं त्यांच भाषेत आम्हाला उत्तर देता येतं.
  • आम्ही आमची मर्यादा कधीही ओलांडली नाही.
  • उद्धव ठाकरेंविरुद्धही वक्तव्य केले नाही.
  • मात्र माननीय मोदींवर शिवसेनेकडून अशी विखारी टीका केली जात असेल तर असे सरकार कशाला चालवायचं ?
  • शिवसेनेची गेल्या काही दिवसांतली भाषा बघा
  • नवे सरकार स्थापन होऊपर्यंत मी काळजीवाहू मुख्यमंत्री. कोणताही नवा, धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही.
  • विरोधकांनी केले नाही इतके घाव शिवसेनेने केले
  • राज्याच्या सरकार मिळण्याचा दृष्टीने जे प्रयत्न असतील ते आम्ही काळजीपूर्वक करू.
  • आमदार फोडाफोडीबाबत आरोप करणाऱ्यांना माझे खुले आव्हान, पुरावे द्या नाहीतर माफी मागा
  • सरकार स्थापन करण्यासाठी भाजप कधीही फोडाफोडीचे राजकारण करणार नाही
  • राज्यात पुढे जे सरकार येईल ते भाजपच्याच नेतृत्त्वाखाली येईल. हा संपूर्ण विश्वास व्यक्त करतो.
  • पुन्हा आम्हाला कौल दिल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो. सरकार स्थापनेसाठी झालेल्या विलंबाबाबत खंत व्यक्त करतो.
  • विरोधक आमचे शत्रू नाहीत. आमचे वैचारिक मतभेद
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकामध्ये लोकशाही आणि प्रामाणिकपणाचा पराभव !

News Desk

बाळासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त वाळू शिल्पातून राम मंदिराचा मुद्दा उपस्थित

News Desk

शिंदेंच्या बंडात मदत करणाऱ्या ‘या’ नेत्यांच्या पदरी ‘मंत्रिपद’ पडणार?

Manasi Devkar