HW News Marathi
राजकारण

मुसलमानांच्या दाढ्यांना हात लावणारे संभाजीनगरचे संरक्षण करणार नाहीत !

औरंगाबाद | “उद्धव ठाकरेंनी म्हणे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिला होता कि शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार आणि स्वतःच मुख्यमंत्री झाले. त्यात, आपल्या मुलाला पण मंत्री करून घेतले. केवळ सत्तेसाठी मुसलमानांच्या दाढ्यांना हात लावणारे, सावरकरांच्या मांडीला मांडी लावून बसणारे या संभाजीनगर शहराचे संरक्षण करणार नाहीत. मात्र, वेळ पडली तर सत्ता सोडून देऊन आपले तत्त्वज्ञान न सोडणारी भारतीय जनता पार्टीच या शहराचे रक्षण करेल, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे”, असे दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या औरंगाबाद येथील सभेत केला आहे. महानगरपालिका निवडणुका तोंडावर आलेल्या असताना पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील बोलत होते.

काहीच दिवसांत होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांसाठी सध्या भाजपने चांगलीच कंबर कसल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना काही सूचना देखील केल्या. “यापुढे माझी कोणतीही सभा होणार नाही. उलट मला तुम्ही एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी चहा प्यायला, जेवायला घेऊन जायचे. त्यातून प्रश्नोत्तरे होतात, चर्चा होते, खऱ्या अडी-अडचणी कळतात. घरी गेल्याने आपुलकी निर्माण होते. नाहीतर सभेत भाषण झाले कि सगळे आपापल्या घरी निघून जातात. आपण बोललेलं पटलं कि नाही ? कळलं कि नाही ? ते कोणालाच कळत नाही”, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले.

शिवसेनेत जर हिंमत असेल तर…!

आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार अशी चर्चा सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळात आहे. याबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला एकट्याने लढण्याचे आव्हान दिले आहे. “शिवसेनेत जर हिंमत असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत न घेता एकएकटे लढा. मग कोण जिंकते ते बघूया”, असे थेट आव्हान यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिले आहे. त्याचप्रमाणे, महाविकास आघाडी सरकारच्या मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयावर चंद्रकांत पाटील यांनी यावेळी चांगलेच तोंडसुख घेतले आहे. केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी महाविकासाआघाडीचे हे सरकार मुस्लिमांना आरक्षण देत असल्याचा आरोप यावेळी चंद्रकांत पाटलांनी केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या…संध्याकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात अंतिम टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी

News Desk

“…तर मी कोणत्याही भ्रष्टाचाराला हात लावणार नाही”, संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप

Aprna

आज जंतरमंतरवर ममतांचे धरणे आंदोलन, पोस्टर्समधून टोला

News Desk