HW News Marathi
राजकारण

युतीच्या सत्तास्थापनेबाबतचा निर्णय भाजपने लिखित स्वरूपात द्यावा !

मुंबई | राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्यात शिवसेना मोठी भूमिका बजावू शकेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या ५६ विजयी आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. या बैठकीत शिवसेनेने सत्तास्थापनेबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विजयी आमदारांच्या आज (२६ ऑक्टोबर) घेतलेल्या बैठकीत युतीच्या सत्तास्थापनेबाबत काय भूमिका स्पष्ट केली आहे. त्याचप्रमाणे, आमदारांच्या पक्षाकडे काय मागण्या आहेत ? जाणून घेऊया.

शिवसेना आमदाराच्या प्रमुख मागण्या

  • राज्याच्या सत्तेत समसमान वाटा मिळावा.
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सत्तास्थापनेबाबत जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल.
  • शिवसेना-भाजप युतीत जो निर्णय घेतला जाईल तो भाजपकडून लिखित स्वरूपात असावा.
  • मुख्यमंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला असावा

विजयी आमदारांसोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले ?

  • लोकसभेवेळीच अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांसोबत यांच्यासोबत झालेल्या चर्चेत शिवसेना-भाजपचा ५०/५० चा फाॅर्म्युला ठरला होता. त्यानुसार, अडीच वर्षे भाजपला तर अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रीपदे मिळतील.
  • लोकसभेवेळी युतीबाबत जे काही ठरले होते ते भाजपच्या वरिष्ठांकडून लिखित स्वरूपात येणे अपेक्षित आहे.
  • मला जे काही ठरले होते त्यापेक्षा जराही जास्त काहीही नको.
  • युतीबाबत जे ठरले होते ते जर प्रत्यक्षात येणार नसेल तर माझ्यापुढे अन्य पर्याय खुले आहेत. पण, मला हे पाप करायचे नाही.
  • शिवसेना-भाजपची युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अभेद्य आहे.

‘अबकी बार २२० पार’चा नारा देणाऱ्या भाजपला फार मुश्किलीने १०० चा आकडा पार करणे शक्य झाले आहे. तर अनेक ठिकाणी महाघाडीमुळे भाजपला धक्का बसला आहे. एकीकडे भाजपची अशी स्थिती असताना दुसरीकडे राज्यात राष्ट्रवादीला जनतेने दिलेला कौल पाहता राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी असही समीकरण पाहायला मिळू शकते, अशाही जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी

Aprna

…मग शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन का नाही ?

News Desk

“जेव्हा आपण सत्तेत होतात…” केसरकरांचा उद्धव ठाकरेंच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाहाणीवर टोला

Aprna