HW News Marathi
राजकारण

भाजपने माणसांचे इमान विकत घेण्याचा पॅटर्न राबवला !

मुंबई | “जळगावात माणसांचे इमान विकत घेण्याचा पॅटर्न राबवला आहे”, असा आरोप माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी चाळीसगावच्या जाहीर सभेत केला आहे. परिवर्तन करायचे असेल तर निर्धार करा. तालुका आणि गावापासून आघाडीला यश मिळवून द्या असे आवाहनही दिलीप वळसे पाटील यांनी केले.

आपल्या विचाराने देश व राज्य कसे घडेल हे आपण विसरलो आहोत. या सरकारने दिलेल्या आश्वासनांना भुललात. परंतु ही आश्वासने फसवी निघाली आहेत, असेही दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी म्हटले आहे. दुसऱ्या टप्प्यातील या परिवर्तन यात्रेच्या सभेत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्र वाघ, राजू देशमुख यांनी देखील आपले विचार मांडले. या सभेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांनी भव्य मोटारसायकल रॅली काढली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

छत्रपतींचा असा अपमान सहन केला जाणार नाही पवारांनी सरकारला खडसावले

News Desk

रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघ मुंबई सरचिटणीस पदी रतन अस्वारे यांची नियुक्ती

News Desk

माझी मुलगी पूर्णपणे निर्दोष, रॅगिंगचा विचारही करू शकत नाही !

News Desk