HW News Marathi
राजकारण

भाजप-शिवसेना युती कायम राहणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई | विधानसभा निवडणुका अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना राज्यात शिवसेना-भाजपची युती कायम राहणार का ? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असला तरीही बुधवारी (२५ सप्टेंबर) झालेल्या माथाडी कामगारांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभेतही युती होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. “आमचे युतीचे सरकार आजही आहे आणि उद्याही कायम राहील. त्यामुळे, आमचेच सरकार येत्या काळात माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवेल. महायुती माथाडी कामगारांच्या पाठीशी आहे”, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील महायुतीचे संकेत दिले आहेत. मात्र, असे असले तरीही युतीची अधिकृत घोषणा मात्र अद्याप बाकी आहे.

मुख्यमंत्र्यांसोबतच उद्धव ठाकरे यांनी देखील आगामी विधानसभेत राज्यात महायुतीचेच सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. “आगामी विधानसभा निवडणूक आम्हीच जिंकणार आणि राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार”, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे दोघेही माथाडी कामगारांचा मेळावा तसेच माजी आमदार अण्णासाहेब पाटील यांची ८६व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात एकत्र उपस्थित होते. यावेळी बोलताना या दोन्ही नेत्यांना भाजप-शिवसेना युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. “आपला माथाडी कायदा जसा आहे तसाच कायदा देशात लागू करण्यासाठी पंतप्रधान प्रयत्नशील आहेत”, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ममतांचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या महिलेची सर्वोच्च न्यायालयाने केली सुटका

News Desk

#MaharashtraElections2019 LIVE UPDATE | सेलिब्रिटींनीदेखील बजावला मतदानाचा हक्क

News Desk

भागवत आणि मोदींकडे एके ४७ कुठून आल्या ?

News Desk