HW News Marathi
राजकारण

चंद्रकांत पाटलांनी दिले रामदास कदमांना तिळगूळ

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप युतीच्या दोन्ही पक्षांच्या नेत्यामध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. परंतु मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर राज्याच्या मंत्र्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेना मंत्र्यांना तिळगूळ दिले आणि गोड गोड बोला, असे म्हटले आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या सुरुवातीलाच राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना तिळगूळ देऊन न भांडण्याची अट घातली. त्यावर रामदास कदम यांनी किमान आज (१५ जानेवारी) तरी भांडणार नसल्याचे कबूल केले. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांवरून वाद राहणारी मंत्रालयातील बैठक आज चांगलीच मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हसत खेळत पार पडली आहे.

अमित शहा यांचा स्वबळाचा नारा

युती होगी तो साथी को जितायेंगे, नही हुई तो पटक देंगे, अशा शब्दात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे.

उद्धव ठाकरेंचे अमित शहांना प्रत्युत्तर

शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आलेला नाही आणि येणारही नाही, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप अध्यक्ष अमित शहांना लगावला आहे. उद्धव स्थानिक लोकाधिकार समितीच्या अधिवेशनात बोलताना म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी २० वर्षे तिकडे होते, त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका !

Gauri Tilekar

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने भोसरी MIDC मधील धक्कादायक प्रकार आणला उघडकीस

News Desk

दिव्यांगांच्या कार्यक्रमात भाजपच्या बाबुल सुप्रीयो यांची एकाला ‘पाय तोडण्याची’ धमकी

News Desk