HW News Marathi
राजकारण

एनआरसीबाबत भाजपची भूमिका दुटप्पी !

मुंबई | “एनआरसीबाबत असलेली नाराजी मी समजू शकतो. परंतु तुमचं आंदोलन शांततेत करा. देशाच्या संपत्तीचे नुकसान करु नका आणि कायदा हातात घेऊ नका”, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंदोलकांना केले आहे. शरद पवार हे आज (२३ डिसेंबर) त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. “एनआरसीबाबत भाजपची नेमकी दुटप्पी भूमिका कशी जाहीर होत आहे”, असेही शरद पवार यांनी यावेळी म्हटले आहे. “सत्ताधाऱ्यांनी शांततेने पाऊले टाकायची असतात. परंतु, सध्याचे सरकार ज्यापध्दतीने धार्मिक अंतर ठेवण्याचा, एकतेला ठेच पोहोचेल अशी पाऊले टाकताना दिसते”, असा आरोपही शरद पवार यांनी केला.

“दिल्लीतील एका सभेत पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंडळ व संसदेत एनआरसीला विरोध झाला नाही असे सांगितले, हे चुकीचे आहे. मी आणि आमचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी संसदेत एनआरसीचे दुष्परिणाम सांगितले होते. तसेच, राष्ट्रपती महोदयांनी दोन्ही सभागृहात अभिभाषणाच्यावेळी एनआरसी विषय सांगितला होता. राष्ट्रपती बोलतात ती सरकारची पॉलिसी ठरलेली असते तेच बोललं जातं. देशाचे गृहमंत्री एनआरसीचा निर्णय देशासाठी घेतल्याचे सभागृहात सांगतात आणि दुसरीकडे पंतप्रधान वेगळे बोलतात”, असे म्हणत शरद पवार यांनी यासंदर्भात आपली नाराजी व्यक्त केली.

“येत्या दोन वर्षांत भाजपाला उतरती कळा लागली असून ती थांबेल असे दिसत नाही”, अशी टीकाही शरद पवार यांनी केली. राष्ट्रीय विषयांवर यापूर्वी सर्वपक्षीय बैठका घेत चर्चा होत होती. मात्र, आता ते होत नाही, असेही शरद पवार यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे, या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी झारखंड विधानसभेच्या निकालांवरही भाष्य केले. महाराष्ट्रानंतर आता भाजपच्या हातून आणखी एक राज्य निसटण्याची चिन्हे दिसत आहेत. झारखंडच्या आतापर्यंत आलेल्या निकालांनुसार भाजप सातत्याने पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्याबद्दल शरद पवारांनी झारखंडच्या जनतेचे अभिनंदन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना २०१९ ची निवडणूक ‘स्वबळावर लढणार’

News Desk

अमोल कोल्हेंकडून उदयनराजेंची मनधरणी सुरू, बंद दाराआड चर्चा

News Desk

आम्हाला त्यावेळी काँग्रेसने प्रतिसाद दिला नाही, आता आम्ही मागे हटणार नाही !

News Desk