HW News Marathi
राजकारण

ईशान्य मुंबईचे दोन्ही उमेदवार कोटक, संजय दीना पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई । महाराष्ट्रासह देशभरात चौथ्या टप्प्यासाठी आज (२९ एप्रिल) मतदान सुरु आहे. ईशान्य मुंबईचे भाजप-शिवसेना युतीचे उमेवार मनोज कोटक यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत सकाळी ७.३० च्या सुमारास मतदानाचा हक्क बजावला आहे. “लोकशाहीच्या उत्सवात सामील होऊन, नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन मनोज कोटक यांनी मतदान केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केले आहे. कोटक यांनी मुलुंड पश्चिम येथील मुलुंड महविद्यालयात आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाआघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांनी भांडूप पश्चिम येथील पालिका शाळेत कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे. “भाजपला ईशान्य मुंबईसाठी उमेदवार मिळत नव्हता. कारण त्यांना पराभवाची भीती वाट होती”, अशी प्रतिक्रिया संजय दीना पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गेल्या साडेचार वर्षात मोदी सरकारने मुस्लिम विरोधीच काम केले | ओवेसी

News Desk

दिवाळीची खरेदी करताय, मग या ठिकाणांना जरूर भेट द्या !

News Desk

सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या सरकारला सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्धार !

News Desk